शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या नावावर वसुलीचा लाभ

By admin | Updated: March 7, 2016 02:45 IST

केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे.

अर्ज विकणाऱ्या टोळ्या सक्रिय : भाजप, मनपा, नासुप्रकडून दखलनागपूर : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींही सरसावले आहेत. नेमका याचा गैरफायदा घेण्यासाठी काही टोळ्या सरसावल्या आहेत. काहींनी बनावट अर्ज छापून त्याची विक्री केली आहे तर काहींनी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैसे उकळणे सुरू केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसात भाजपचे पदाधिकारी, महापालिका व नासुप्रकडे आल्या आहेत. संबंधितांनी याची गंभीर दखल घेतली आहे.केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला हक्काचे घर दिले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी, प्रचार, प्रसार करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज महापालिकेत नि:शुल्क उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अर्ज महापालिकेत नेमून दिलेल्या केंद्रावर जमा करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. महापालिकेतर्फे त्याची पावतीही दिली जाते. मात्र, काही असामाजिक तत्त्वांनी या योजनेचेही अर्ज छापले असून त्यांची २०० रुपयांना विक्री केली जात आहे. अर्ज विकताना याची जाहीर वाच्यता करू नका, जास्त लोकांना माहीत झाले तर तुमचा नंबर लागणार नाही, अशी ताकीद देऊन नागरिकांना चूप राहण्याचा सल्ला या भामट्यांकडून दिला जात आहे. गेल्या आठवड्यात अशा स्वरूपाच्या तक्रारी भाजपच्या आमदारांना प्राप्त झाल्या. आमदारांनी याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. पंतप्रधान आवास योजनेची प्रसिद्धी करावी, या योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कुठे संपर्क साधावा याची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली. शिवाय अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून महापालिकेने जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली. नासुप्रतर्फे नंदनवन ले-आऊट येथे मॉडेल हाऊस बिल्डिंग उभारण्यात आली आहे. या घरांची किंमत बाजार किमतीच्या ४० टक्केच आहे. अशाच प्रकारची घरे स्वस्तात नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. संबंधित घरांच्या वाटपासाठी नासुप्रतर्फे रीतसर वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार असून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. अद्याप नासुप्रने अर्ज मागविण्यासाठी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही किंवा अर्ज स्वीकारण्यास सुरुवातही केलेली नाही. मात्र, काही असामाजिक तत्त्वांकडून संबंधित गाळ्यांसाठी अर्जांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तर लाभार्थ्यांना गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी एक-दीड लाख रुपये देण्याची मागणी केली आहे अशा तक्रारी नासुप्रकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत नासुप्रचे पथक कामी लागले असून संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये. काहीही माहिती हवी असल्यास थेट नासुप्रशी संपर्क साधावा, असे आवाहन नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी केले आहे.(प्रतिनिधी)