शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

लाभाथींंना दोन वर्षापासून रमाई घरकुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रमाई घरकूल योजनेचे नागपुरात ३०४६ लाभार्थी मंजूर आहेत. या योजनेत लाभाथींंना घरकुलासाठी तीन टप्प्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रमाई घरकूल योजनेचे नागपुरात ३०४६ लाभार्थी मंजूर आहेत. या योजनेत लाभाथींंना घरकुलासाठी तीन टप्प्यात २.५० लाखांचे अनुदान मिळते. परंतु गेल्या दीड-दोन वर्षापासून शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने हजारो लाभार्थीना रमाई घरकुलाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जुने अर्ज निकाली न निघाल्याने नवीन ४ हजार ५०० अर्ज प्रलंबित आहे. शासनाकडून अनुदान अप्राप्त असल्याने व मनपा प्रशासनाकडून याचा योग्य प्रकारे शासनाकडे पाठपुरावा केला जात नसल्याबाबत मंगळवारी मनपा सभागृहात नगरसेकांनी नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे रखडलेल्या रमाई आवास योजनेसंदर्भात वृत्त प्रकाशित करून लोकमतने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याचे पडसाद मंगळवारी सभागृहात उमटले. बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेकांना भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. लाभार्थीना अनुदान मिळत नसल्याने नवीत साडेचार हजार अर्ज प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. भाजपचे नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी पात्र लाभार्थींना लाभ मिळावा, अशी मागणी केली. शासनाने दिलेल्या ४१ कोटी निधीतील ४० कोटी खर्च झाले असून, १ कोटी शिल्लक आहेत. निधीवर व्याज जमा झाले आहेत. राज्याकडे आणखी ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी दिली. निधी प्राप्त व्हावा, यासाठी ८ दिवसांपूर्वीच समाजकल्याण विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येतो. वर्ष २०२० मध्ये राज्य शासनाकडून दीड कोटी निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी निधी अभावी नागरिकांना भाड्याने राहण्याची वेळ येणे, ही योग्य बाब नसल्याची नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने यासंदर्भातील सखोल अहवाल पालकमंत्र्यांकडे पाठवावा. निधी तातडीने मिळावा याकरिता प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात यावा. निगम आयुक्तांनीही यात लक्ष घालावे, असे निर्देश त्यांनी दिले.