शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

रमाई आवास योजनेच्या ‘वाढीव निधी’पासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

नरखेड : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटक संवर्गातील नागरिकांच्या उत्थानासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या ...

नरखेड : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटक संवर्गातील नागरिकांच्या उत्थानासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या जनउपयोगी योजना शतप्रतिशत यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहिल्याची बाब नरखेड न.प. क्षेत्रात उघडकीस आली आहे.

‘रमाई आवास योजने अंतर्गत’ शहरात गत पाच वर्षात घरकूल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आदेशानंतरही ३४ लाभार्थ्यांना १ लाख रुपयांचा वाढीव निधी मिळालेला नाही. यासंदर्भात नगर परिषदेकडून राज्य शासनाच्या पत्रानुसार ९ सप्टेंबर २०२० रोजी लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आले होते. आतापर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नगर पालिका प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. त्याचबरोबर वाढीव निधी मिळविण्याच्या आशेने नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थ्यांच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र कुणीही त्यांची तक्रार ऐकून घेण्यास तयार नाही.

वाढीव निधीचे प्रस्ताव वर्षभरापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. त्यानंतर अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. मंजुरी शिवाय फाईल तशीच पडून आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- अभिजित गुप्ता, नगराध्यक्ष, नरखेड