शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दत्तक गाव योजनेला खीळ

By admin | Updated: January 9, 2016 03:31 IST

जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ ३७ सदस्यांनीच गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ ३७ सदस्यांनीच गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे. उर्वरित २१ सदस्य मात्र अजूनही उदासीन असल्याची माहिती समोर आली आहे. यात बहुतांश सदस्य विरोधी पक्षातील असल्याचे दिसते. त्याचबरोबर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनीही योजनेला गंभीरतेने घेतले नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेत पंतप्रधानांनी राबविलेल्या दत्तक ग्राम योजनेबद्दल दिसून आलेल्या उदासीनतेमुळे या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. प्रत्येक खासदाराने किमान एक गाव दत्तक घेऊन ‘गाव दत्तक’ योजनेंतर्गत त्या गावाचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला राज्य सरकारनेही प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांसह बहुतांश आमदारांनी एक गाव दत्तक घेऊन गावाच्या विकासाला चालना दिली. पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेतही करण्यात आले. सर्वप्रथम जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी गाव दत्तक घेतले. त्यांच्यापाठोपाठ काही सदस्यांनीही गावे दत्तक घेण्यास सुरुवात केली. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तालुक्यातील फेटरी तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विहीरगावसह तीन गावे दत्तक घेतली. आराखडा तयार करून संबंधित गावांमध्ये विकासकामेही सुरू झाली आहेत. जि. प. हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील असंख्य गावे अजूनही समस्याग्रस्त व अविकसित आहेत. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष सभापतींनी या योजनेंतर्गत गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा किंबहुना त्या गावांचा विकास करण्यास पुढाकार घेतला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, वीज नाही, शिक्षण, आरोग्याची सोय नाही. त्यामुळे इतर सदस्यांनी गावे दत्तक घेऊन विकास केल्यास गावे समृद्ध व निर्मल होतील. मात्र, २१ सदस्यांनी या योजनेकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. सभागृहात ग्रामीण समस्या पोटतिडकीने मांडण्याचा ‘फार्स’ करणाऱ्या अनेक सदस्यांनी गावेच दत्तक घेतली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)