शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जात असणे ठीक आहे; पण जातिभेद वाईटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 21:37 IST

Nagpur News जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले.

नागपूर : व्यवसायानुसार देशात जाती पडल्या असतील; पण जातिव्यवस्थेला धर्मशास्त्राचा कुठलाही आधार नाही. जात असणे ठीक आहे; पण जातिभेद पाळणे वाईटच आहे. जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले.

हिंदू धर्म-संस्कृती मंदिर, धंताेलीच्या स्थापना दिनानिमित्त ‘सनातन भारत’ या विषयावर बनियन सभागृह, चिटणवीस सेंटर येथे त्यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. डाॅ. वैद्य यांच्या मते आपल्यात राष्ट्रवादी नव्हे राष्ट्रीयतेचा भाव यायला हवा. काेराेनाकाळात हा भाव निर्माण झाला हाेता, जेव्हा लाखाे लाेक सेवेसाठी बाहेर पडले हाेते. भारत काळानुसार आपल्या व्यवस्थेत परिवर्तन आणि इतरांचेही देशानुकूल अनुकरण करीत आला आहे. संघानेही स्वयंसेवकांमध्ये अनुशासन यावे म्हणून ब्रिटिश मिल्ट्रीकडून परेड आणि बॅण्डपथक स्वीकारले हाेते.

डाॅ. वैद्य म्हणाले, जेव्हा धर्मावर ग्लानी येथे तेव्हा आध्यात्मिक शक्तींचा उदय हाेताे. बाबराचे आक्रमण झाले तेव्हा देशात संत परंपरेच्या रूपात आध्यात्मिक शक्तीचा उदय झाला हाेता. मंदिरात जाणे, पूजापाठ, अर्घ्य करणे म्हणजे धर्म नव्हे, हा केवळ उपासनेचा भाग आहे. धर्म हा आचरणाचा भाग आहे. धर्म म्हणजे डाेळे उघडे करून जगाकडे पाहणे आणि अहंपणाचा त्याग करणे हाेय. आपल्याजवळ असलेले देणे म्हणजे चॅरिटी हाेय; पण जे समाजाकडून घेतले ते परत करण्याचा भाव म्हणजे धर्म हाेय. म्हणून देशाच्या लाेकसभेत धर्मचक्र प्रवर्तनाचा उद्घाेष हाेताे.

भारत शेतीप्रधान देश आहे असे म्हणतात. मात्र भारत हा शेतीसाेबत उद्याेगप्रधान देश हाेता. येथील चामड्याच्या वस्तू, परफ्यूम, मसाले आणि साेने, चांदी, काॅपर अशा धातूंच्या वस्तूंना परदेशात माेठी मागणी हाेती. या वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने नव्हते तर त्या लाेकांच्या घरी बनविल्या जायच्या. कुटुंबातील महिलांपासून बालकांपर्यंत सर्वांचा त्यात सहभाग असायचा. यासाठी काेणत्या विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेची गरज पडली नाही. म्हणून १७व्या शतकात भारताचा व्यापार जगात सर्वाधिक हाेता.

भारतीय परंपरेत आपले आहे तेवढेच स्वीकारण्याचा भाव आहे. भ्रष्टाचार ही भारताची परंपरा नाही. वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी साध्या साध्या गाेष्टीत अनुशासन निर्माण व्हायला हवे. आपण जे घेतले ते समाजाला परत करण्याचा भाव हा ईश्वरी पूजेचा भाव आहे आणि हाच भारतीयतेचा भाव आहे. भारताने भाैतिक समृद्धीला नाकारले नाही व आध्यात्मिक शक्तीला साेडले नाही. संपूर्ण जग आज भाैतिक जीवनशैलीने पछाडले आहे आणि सर्वांना सुखी जीवनासाठी अध्यात्माची गरज आहे. या जगाला आध्यात्मिक परंपरेने एकत्र जाेडणे ही भारताची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन डाॅ. वैद्य यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ