शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जात असणे ठीक आहे; पण जातिभेद वाईटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 21:37 IST

Nagpur News जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले.

नागपूर : व्यवसायानुसार देशात जाती पडल्या असतील; पण जातिव्यवस्थेला धर्मशास्त्राचा कुठलाही आधार नाही. जात असणे ठीक आहे; पण जातिभेद पाळणे वाईटच आहे. जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले.

हिंदू धर्म-संस्कृती मंदिर, धंताेलीच्या स्थापना दिनानिमित्त ‘सनातन भारत’ या विषयावर बनियन सभागृह, चिटणवीस सेंटर येथे त्यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. डाॅ. वैद्य यांच्या मते आपल्यात राष्ट्रवादी नव्हे राष्ट्रीयतेचा भाव यायला हवा. काेराेनाकाळात हा भाव निर्माण झाला हाेता, जेव्हा लाखाे लाेक सेवेसाठी बाहेर पडले हाेते. भारत काळानुसार आपल्या व्यवस्थेत परिवर्तन आणि इतरांचेही देशानुकूल अनुकरण करीत आला आहे. संघानेही स्वयंसेवकांमध्ये अनुशासन यावे म्हणून ब्रिटिश मिल्ट्रीकडून परेड आणि बॅण्डपथक स्वीकारले हाेते.

डाॅ. वैद्य म्हणाले, जेव्हा धर्मावर ग्लानी येथे तेव्हा आध्यात्मिक शक्तींचा उदय हाेताे. बाबराचे आक्रमण झाले तेव्हा देशात संत परंपरेच्या रूपात आध्यात्मिक शक्तीचा उदय झाला हाेता. मंदिरात जाणे, पूजापाठ, अर्घ्य करणे म्हणजे धर्म नव्हे, हा केवळ उपासनेचा भाग आहे. धर्म हा आचरणाचा भाग आहे. धर्म म्हणजे डाेळे उघडे करून जगाकडे पाहणे आणि अहंपणाचा त्याग करणे हाेय. आपल्याजवळ असलेले देणे म्हणजे चॅरिटी हाेय; पण जे समाजाकडून घेतले ते परत करण्याचा भाव म्हणजे धर्म हाेय. म्हणून देशाच्या लाेकसभेत धर्मचक्र प्रवर्तनाचा उद्घाेष हाेताे.

भारत शेतीप्रधान देश आहे असे म्हणतात. मात्र भारत हा शेतीसाेबत उद्याेगप्रधान देश हाेता. येथील चामड्याच्या वस्तू, परफ्यूम, मसाले आणि साेने, चांदी, काॅपर अशा धातूंच्या वस्तूंना परदेशात माेठी मागणी हाेती. या वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने नव्हते तर त्या लाेकांच्या घरी बनविल्या जायच्या. कुटुंबातील महिलांपासून बालकांपर्यंत सर्वांचा त्यात सहभाग असायचा. यासाठी काेणत्या विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेची गरज पडली नाही. म्हणून १७व्या शतकात भारताचा व्यापार जगात सर्वाधिक हाेता.

भारतीय परंपरेत आपले आहे तेवढेच स्वीकारण्याचा भाव आहे. भ्रष्टाचार ही भारताची परंपरा नाही. वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी साध्या साध्या गाेष्टीत अनुशासन निर्माण व्हायला हवे. आपण जे घेतले ते समाजाला परत करण्याचा भाव हा ईश्वरी पूजेचा भाव आहे आणि हाच भारतीयतेचा भाव आहे. भारताने भाैतिक समृद्धीला नाकारले नाही व आध्यात्मिक शक्तीला साेडले नाही. संपूर्ण जग आज भाैतिक जीवनशैलीने पछाडले आहे आणि सर्वांना सुखी जीवनासाठी अध्यात्माची गरज आहे. या जगाला आध्यात्मिक परंपरेने एकत्र जाेडणे ही भारताची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन डाॅ. वैद्य यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ