शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
5
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
6
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
7
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
8
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
9
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
10
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
11
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
12
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
13
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
14
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
15
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
16
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
17
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
19
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
20
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात

By admin | Updated: May 23, 2016 03:00 IST

भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे,

बुद्ध जयंती महोत्सव : बालचंद्र खांडेकर यांचा इशारानागपूर : भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, असा इशारा बौद्ध-आंबेडकरी विचारवंत डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दीक्षाभूमी येथे दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रविवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावर डॉ. खांडेकर बोलत होते. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, माजी सनदी अधिकारी नानक रामटेके, प्रा. देवीदास घोडेस्वार वक्ते होते. स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विजय चिकाटे आणि विलास गजघाटे व्यासपीठावर होते. डॉ. बालचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. या देशात तथागत गौतम बुद्धाने वेद, यज्ञ आणि वर्णव्यवस्थेला नाकारून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूत्वावर आधारलेली क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे भारत जगात ओळखला गेला. भारतात सोन्याचा धूर निघायचा असे सांगितले जाते. तो काळ म्हणजेच बुद्धाचा काळ होता. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने प्रतिक्रांती करीत या देशातून बौद्ध धम्म हद्दपार केला. बौद्ध तत्त्वज्ञान गाडून टाकले. परिणामी हा देश हजारो वर्षे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून राहिला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल अडीच हजार वर्षानंतर या देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित क्रांती केली. देशाची मुद्रा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रध्वज इतकेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेतही बुद्धाचे तत्त्वज्ञान दिसून येते. यामुळे प्रस्थापित व्यवस्था पुन्हा अस्वस्थ झाली. ते ही व्यवस्था उलथवण्याचा सातत्याने प्रयत्नात होती. ती संधी त्यांना आता मिळाली आहे. त्यामुळे यापासून सावध राहावे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्यावेळी त्रिशरण पंचशीलेसोबत ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्या भविष्यातील हा धोका ओळखूनच जाणीवपूर्व दिल्या होत्या. हे समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा या २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे, नानक रामटेके व जितेंद्र घोडेस्वार यांनीही विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)