शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात

By admin | Updated: May 23, 2016 03:00 IST

भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे,

बुद्ध जयंती महोत्सव : बालचंद्र खांडेकर यांचा इशारानागपूर : भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, असा इशारा बौद्ध-आंबेडकरी विचारवंत डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दीक्षाभूमी येथे दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रविवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावर डॉ. खांडेकर बोलत होते. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, माजी सनदी अधिकारी नानक रामटेके, प्रा. देवीदास घोडेस्वार वक्ते होते. स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विजय चिकाटे आणि विलास गजघाटे व्यासपीठावर होते. डॉ. बालचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. या देशात तथागत गौतम बुद्धाने वेद, यज्ञ आणि वर्णव्यवस्थेला नाकारून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूत्वावर आधारलेली क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे भारत जगात ओळखला गेला. भारतात सोन्याचा धूर निघायचा असे सांगितले जाते. तो काळ म्हणजेच बुद्धाचा काळ होता. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने प्रतिक्रांती करीत या देशातून बौद्ध धम्म हद्दपार केला. बौद्ध तत्त्वज्ञान गाडून टाकले. परिणामी हा देश हजारो वर्षे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून राहिला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल अडीच हजार वर्षानंतर या देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित क्रांती केली. देशाची मुद्रा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रध्वज इतकेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेतही बुद्धाचे तत्त्वज्ञान दिसून येते. यामुळे प्रस्थापित व्यवस्था पुन्हा अस्वस्थ झाली. ते ही व्यवस्था उलथवण्याचा सातत्याने प्रयत्नात होती. ती संधी त्यांना आता मिळाली आहे. त्यामुळे यापासून सावध राहावे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्यावेळी त्रिशरण पंचशीलेसोबत ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्या भविष्यातील हा धोका ओळखूनच जाणीवपूर्व दिल्या होत्या. हे समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा या २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे, नानक रामटेके व जितेंद्र घोडेस्वार यांनीही विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)