शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात

By admin | Updated: May 23, 2016 03:00 IST

भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे,

बुद्ध जयंती महोत्सव : बालचंद्र खांडेकर यांचा इशारानागपूर : भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, असा इशारा बौद्ध-आंबेडकरी विचारवंत डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दीक्षाभूमी येथे दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रविवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावर डॉ. खांडेकर बोलत होते. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, माजी सनदी अधिकारी नानक रामटेके, प्रा. देवीदास घोडेस्वार वक्ते होते. स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विजय चिकाटे आणि विलास गजघाटे व्यासपीठावर होते. डॉ. बालचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. या देशात तथागत गौतम बुद्धाने वेद, यज्ञ आणि वर्णव्यवस्थेला नाकारून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूत्वावर आधारलेली क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे भारत जगात ओळखला गेला. भारतात सोन्याचा धूर निघायचा असे सांगितले जाते. तो काळ म्हणजेच बुद्धाचा काळ होता. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने प्रतिक्रांती करीत या देशातून बौद्ध धम्म हद्दपार केला. बौद्ध तत्त्वज्ञान गाडून टाकले. परिणामी हा देश हजारो वर्षे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून राहिला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल अडीच हजार वर्षानंतर या देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित क्रांती केली. देशाची मुद्रा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रध्वज इतकेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेतही बुद्धाचे तत्त्वज्ञान दिसून येते. यामुळे प्रस्थापित व्यवस्था पुन्हा अस्वस्थ झाली. ते ही व्यवस्था उलथवण्याचा सातत्याने प्रयत्नात होती. ती संधी त्यांना आता मिळाली आहे. त्यामुळे यापासून सावध राहावे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्यावेळी त्रिशरण पंचशीलेसोबत ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्या भविष्यातील हा धोका ओळखूनच जाणीवपूर्व दिल्या होत्या. हे समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा या २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे, नानक रामटेके व जितेंद्र घोडेस्वार यांनीही विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)