शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

जातीचे नव्हे विचारांचे वारस व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:54 IST

महापुरुषांच्या विचारांना जातीपुरते मर्यादित करण्याची वाईट सवय आपल्या देशात आहे. एका अस्पृश्याने या देशाचे संविधान लिहिल्यामुळे संविधानालाही विरोध झाला, अशी मानसिकता आहे. तेव्हा महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका. त्यांच्या जातीचे वारस होण्याऐवजी विचारांचे वारस व्हा. त्याशिवाय महापुरुषांचे विचार समजू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठी समाजशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश वाघमारे यांनी येथे केले.

ठळक मुद्देडॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला : सुरेश वाघमारे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापुरुषांच्या विचारांना जातीपुरते मर्यादित करण्याची वाईट सवय आपल्या देशात आहे. एका अस्पृश्याने या देशाचे संविधान लिहिल्यामुळे संविधानालाही विरोध झाला, अशी मानसिकता आहे. तेव्हा महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका. त्यांच्या जातीचे वारस होण्याऐवजी विचारांचे वारस व्हा. त्याशिवाय महापुरुषांचे विचार समजू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठी समाजशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश वाघमारे यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘डॉ. आंबेडकरांचा सामाजिक पुनर्रचनेचा दृष्टिकोन आणि सद्यस्थिती’ याविषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित होते.ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातविरहित समाजरचनेवर भर दिला होता. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपण आजही जातीतच जगतो आणि जातीतच मरतो जातविरहित समाजरचना आपण निर्माण करू शकलो नाही. कारण महापुरुषांचे विचार न पाहता आपण त्याची जात पाहत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका देशापुरते किंवा समाजापुरते मर्यादित नाहीत. तर ते समस्त मानव कल्याणाचा विचार आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे दुर्लक्षित करता येणार नाही किंवा त्याला नाकारताही येणार नाही. देशाला व जगाला प्रकाशित करण्याचा हा विचार आहे, तेव्हा राष्ट्रनिर्माणासाठी जातीभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी युवा स्पंदनमध्ये पुरस्कार मिळविणाऱ्या दिलीप गायकवाड, सुप्रिया वालदे आणि वैभव ओगले या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. प्रा. शैलेश धोंगडे यांनी आभार मानले.समतेला शह देण्यासाठीच समरसताशोषितांचा वर्गच असू नये हीच खरी समता होय. समतेचा हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या माध्यमातून तो रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु या समतेला शह देण्यासाठी समरसता पुढे केली जाते. देशात समता प्रस्थापित होऊ नये यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचेही डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य