शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रिपाइंमुळेच सेना-भाजपला यश

By admin | Updated: July 30, 2014 01:21 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आ.) ज्यांच्यासोबत असते, त्या पक्षाची सत्ता येते. रिपाइंच्या मतामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला यश मिळाल्याचा दावा पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले

पदाधिकारी मेळावा : रामदास आठवले यांचा दावानागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आ.) ज्यांच्यासोबत असते, त्या पक्षाची सत्ता येते. रिपाइंच्या मतामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला यश मिळाल्याचा दावा पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी केला. श्री साई सभागृहात आयोजित रिपाइंच्या विभागीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव बन्सोड तर प्रमुखवक्ते प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर उपस्थित होते. मी मंत्रिपदासाठी नव्हे तर समाजाला न्याय मिळावा म्हणून महायुतीत सहभागी झालो. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे. यासाठी झोपडपट्टी संरक्षण कायदा अमलात आणावा. तसेच दलित महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी दलित महिला आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.राज्यातील विविध समाज घटकांना एकत्रित करून गाव तेथे रिपाइं शाखा सुरू करा. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन आठवले यांनी केले.प्रत्येक जिल्ह्यात २ ते ३ जागा मिळाव्या, अशी रिपाइंची मागणी आहे. सेना-भाजपने महायुतीत सन्मान ठेवला पाहिजे. आठवलेंना केंद्रात मंत्रिपद , राज्यात विधान परिषदेच्या ४ जागा तसेच सत्तेत १५ टक्के वाटा मिळावा, अशी मागणी भुपेश थुलकर यांनी केली. आठवले हेच महायुतीचे जनक असल्याने रिपाइंचा सन्मान झाला पाहिजे, असे मत भीमराव बन्सोड यांनी व्यक्त केले. रवी शेंडे, माजी आमदार अनिल गोंडाणे, सुधाकर तायडे, एल.के.मडावी, अनु दहेगावकर आदींनी मार्गदर्शन केले. राजु बहादुरे, दुर्वास चौधरी,आर.एस.वानखेडे, पवन गजभिये, अशोक मेश्राम, विकास गणवीर, सदा भोवते, अशोक घोटेकर, राजेश रामटेके, सरोज बहादुरे, विजय आगलावे, मेघराज घुटके आदी व्यासपीठावर होते. मेळाव्याला पूर्व विदर्भातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)