शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

नोंदणी करायचीय, धर्म आणि जात सांगा; अनेक विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नागपूर, दि. 31 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र काही विद्यार्थ्यांकडून जात व धर्म मानण्यात येत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या ‘आॅनलाईन’ अर्जांचा स्वीकारच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी प्रक्रिया अडचणीत आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे नागपूरसोबतच देशातील दुस-या राज्यांतून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच धर्म आणि जातीचा उल्लेख केलेला नाही. तर काही विद्यार्थ्यांच्या ‘टीसी’वर धर्म, जातीची नोंद नाही. मात्र नोंदणी प्रक्रियेत जात व धर्म टाकणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. 

काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यापीठाच्या अधिका-यांकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत त्याला मान्य करण्यास अधिका-यांनी नकार दिला. 

ईशान्येकडील राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता, विद्यापीठ राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘आधार’ अनिवार्यच...

विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना आधार कार्डाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना सरकारकडून कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाच्या कुठल्याही योजनेत त्यांचा सहभाग नाही. मात्र तरीदेखील त्यांना आधार कार्ड क्रमांक मागण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेच आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे, असे डॉ. खटी यांनी सांगितले.