शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

नोंदणी करायचीय, धर्म आणि जात सांगा; अनेक विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नागपूर, दि. 31 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र काही विद्यार्थ्यांकडून जात व धर्म मानण्यात येत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या ‘आॅनलाईन’ अर्जांचा स्वीकारच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी प्रक्रिया अडचणीत आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे नागपूरसोबतच देशातील दुस-या राज्यांतून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच धर्म आणि जातीचा उल्लेख केलेला नाही. तर काही विद्यार्थ्यांच्या ‘टीसी’वर धर्म, जातीची नोंद नाही. मात्र नोंदणी प्रक्रियेत जात व धर्म टाकणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. 

काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यापीठाच्या अधिका-यांकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत त्याला मान्य करण्यास अधिका-यांनी नकार दिला. 

ईशान्येकडील राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता, विद्यापीठ राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘आधार’ अनिवार्यच...

विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना आधार कार्डाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना सरकारकडून कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाच्या कुठल्याही योजनेत त्यांचा सहभाग नाही. मात्र तरीदेखील त्यांना आधार कार्ड क्रमांक मागण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेच आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे, असे डॉ. खटी यांनी सांगितले.