शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

टू बी ऑर नॉट टू बी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. यासंदर्भात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा असल्याने सर्वांचे लक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे लागले आहे. परंतु विद्यापीठाने यासंदर्भात अद्यापही कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार की नाही, असा सवाल महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

‘कोरोना’मुळे मार्च २०२० पासून महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लागला. आता स्थिती नियंत्रणात येत असताना ‘कोरोना’ नियमावलींचे पालन करून वर्गात शिकवणीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले. महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करताना आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी अनिवार्य असणार आहे. वर्गात आळीपाळीने विद्यार्थी बोलावले जातील. वर्गात गर्दी होणार नाही, याची काळजी प्राचार्य, प्राध्यापकांना घ्यावी लागेल, अशा सूचनादेखील दिल्या.

यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील दिशानिर्देश जारी करणे आवश्यक होते. मंगळवारी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली व १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा सूरदेखील दिसून आला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही अधिकृतपणे कुठलीही सूचना महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून सातत्याने महाविद्यालयांना विचारणा करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडेच काही माहिती नसल्याने संभ्रम वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तयारी करायला वेळ हवा

विद्यापीठाने अद्यापही काहीही सूचना दिलेली नाही. जर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करायची असतील तर विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक राहणार आहे. शिवाय वेळापत्रक निश्चित करणे यासारख्या बाबीदेखील निश्चित कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून नेहमीची लेटलतिफी कधी संपणार, असा प्रश्न एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला.

स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेणार का?

राज्यात नागपुरातील ‘कोरोना’ रुग्णांची स्थिती अद्यापही हवी तशी आटोक्यात आलेली नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू होणार की १५ फेब्रुवारीपासून वर्गांची पहिली घंटा वाजणार याबाबत व्यवस्थापनांकडेदेखील उत्तर नाही. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.