शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

कागदी नियोजनापेक्षा प्रत्यक्ष सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे ...

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे गरजेचे आहे. तालुका किंवा गावपातळीवर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सर्वांत आधी ती जिल्हा प्रशासनाला कळवावी. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनीची खात्री सर्व अधिकाऱ्यांनी करावी, स्वत: दूरध्वनी करावेत. जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. छत्रपती सभागृहात मान्सूनपूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकुंश गावंडे, पेंच पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, दक्षिण नागपूर पाटबंधारेचे अभियंता राजेश दमणे, गोसीखुर्द धरण वाही (पवनी) चे अभियंता राजेश शर्मा उपस्थित होते.

हवामान संबंधित वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अलर्ट नागरिकांना देण्यात यावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणाऱ्या निवारागृहात स्वच्छता असावी. पूरपरिस्थिती असलेल्या गावात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता असते, ते पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.

लहान मुले, अपंग व वृद्धांचे स्थलांतरण करताना योग्य ती काळजी घ्यावी. आपत्तीकाळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या लोकांशी संपर्क करावा. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

बॉक्स

- संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, या अनुंषगाने जलसंपदा, कृषी, महावितरण, सर्व उपविभागीय अधिकारी, यांनी सतर्क राहण्यासोबतच समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत सिंचन विभागांनी तत्परतेने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.