शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कागदी नियोजनापेक्षा प्रत्यक्ष सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे ...

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे गरजेचे आहे. तालुका किंवा गावपातळीवर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सर्वांत आधी ती जिल्हा प्रशासनाला कळवावी. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनीची खात्री सर्व अधिकाऱ्यांनी करावी, स्वत: दूरध्वनी करावेत. जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. छत्रपती सभागृहात मान्सूनपूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकुंश गावंडे, पेंच पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, दक्षिण नागपूर पाटबंधारेचे अभियंता राजेश दमणे, गोसीखुर्द धरण वाही (पवनी) चे अभियंता राजेश शर्मा उपस्थित होते.

हवामान संबंधित वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अलर्ट नागरिकांना देण्यात यावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणाऱ्या निवारागृहात स्वच्छता असावी. पूरपरिस्थिती असलेल्या गावात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता असते, ते पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.

लहान मुले, अपंग व वृद्धांचे स्थलांतरण करताना योग्य ती काळजी घ्यावी. आपत्तीकाळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या लोकांशी संपर्क करावा. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

बॉक्स

- संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, या अनुंषगाने जलसंपदा, कृषी, महावितरण, सर्व उपविभागीय अधिकारी, यांनी सतर्क राहण्यासोबतच समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत सिंचन विभागांनी तत्परतेने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.