शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाशी प्रामाणिक रहा

By admin | Updated: November 29, 2015 03:56 IST

आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते.

संदीप तामगाडगे यांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र : कार्यगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शननागपूर : आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. म्हणून उठा, जागे व्हा, लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, हा गुरुमंत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोमध्ये (सीबीआय) आपली सेवा देणारे डीआयजी संदीप तामगाडगे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना दिला.महात्मा जोतिबा फुले स्मृती दिनानिमित्त जोतिबा फुले अभ्यासिका व ग्लोबल पीस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप तामगाडगे यांचा कार्यगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. व्यासपीठावर मुख्य मार्गदर्शक म्हणून केंद्र उत्पादन शुल्कचे सहायक आयुक्त प्रशांत रोकडे, आयकर विभागाचे उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, एन.ए.ठमके उपस्थित होते. २००१ च्या नागालॅण्ड कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले व उत्कृष्ट कार्याचे २००७ सालचे राष्ट्रपती पदक मिळालेले तामगाडगे म्हणाले, सातवीत नापास झाल्यानंतर वडिलांचा तो उपदेश कधीच विसरलो नाही. त्यानंतर कोणत्याही परीक्षेत नापास झालेलो नाही. बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यावेळी तीन वर्षांतच नागरी परीक्षा पास करण्याचे ठरविले आणि त्या मार्गाने वाटचाल केली. वयाच्या २२ व्या वर्षी ही परीक्षा पास केली. परीक्षेचे नियोजन, वेळेचे नियोजन, कष्ट करण्याची तयारी आणि यात प्रामाणिकता असेल तर कुठलीच परीक्षा कठीण नाही. नागरी परीक्षेसाठी सलग आठ तास प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची तयारी ठेवावी. सोबतच काय वाचायचे आहे, ते माहीत असणे आवश्यक आहे. आयुष्य एकदाच मिळते. ते चांगले जगायचे की वाईट हे आपल्याच हातात असते. तुमच्या परिस्थितीची जाणीव, आई-वडिलांच्या अपेक्षा या जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढेच चांगले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आणि आई-वडिलांमुळे मला हे यश गाठते आले, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)नागालॅण्डच्या मुख्यमंत्र्यांकडून तामगाडगेंच्या कार्याचे कौतुकनागालॅण्डचे मुख्यमंत्री टी. आर. झेलिआंग यांनी पाठविलेल्या संदीप तामगाडगे यांच्या कार्याच्या कौतुकाचे आणि शुभेच्छा संदेशाचे वाचन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. संदेशात, तामगाडगे यांनी नागालॅण्ड आणि सीबीआय या दोघांसाठीही प्रामाणिकतेने कष्ट घेतले आहे. नागरीक केंद्रित आणि नेहमी मदतीला धावून जाणाऱ्या तामगाडगे यांनी नागालॅण्डचे नाव उज्वल केले आहे, असे नमूद आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तामगाडगे यांच्या कार्याचा गौरवगुन्हे शाखेचे उपायुक्त दीपाली मासीरकर, मेट्रोचे गोघाटे, पोलीस अधिकारी एस.डी. मिश्रा, जिल्हा समाज कल्याणचे अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, आ. पंकज भोयर, धम्मज्योती गजभिये, के.एस. इंगळे, अतुल खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतातून तामगाडगे यांच्या कार्याचा गौरव केला. ‘म. जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य’ पत्रिकेचे प्रकाशन दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तामगाडगे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांची आई कुसुम तामगाडगे व पत्नी लीना तामगाडगे उपस्थित होत्या. प्रास्ताविक बानाईचे सुनील तलवारे यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार एन. ए. ठमके यांनी मानले. कार्यक्रमात विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तामगाडगे यांचा सत्कार केला. ‘महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य’ या पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित झाले. सभागृहाच्या आत आणि बाहेरही गर्दीतामगाडगे यांना ऐकण्यासाठी वसंतराव देशपांडे सभागृह खच्चून भरले होते. आयोजकांना ऐनवेळी सभागृहाच्या बाहेर स्क्रिन लावावे लागले. सभागृहाच्या बाहेरही बरीच गर्दी होती. या कार्यक्रमाला आ. प्रकाश गजभिये व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला ‘नायक’यशवंत मनोहर म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीत तयार झालेले संदीप तामगाडगे हे ‘मिसाईल मॅन’ आहेत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला नायक, जो क्रांतीच्या चळवळीला अपेक्षित आहे, असे तामगाडगे यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येत युवकांनी एकत्र येणे हा त्यांच्या कार्याचा आदर आहे. या नायकाची प्रेरणा घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. ‘क्वालिटी’ अभ्यास आवश्यक डॉ. बोरकर म्हणाले, पदवीचे शिक्षण घेत असतानाच पहिल्या वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा. आपल्या मनातील न्यूनगंड काढावा. ‘हो मी हे करू शकतो’, अशी सकारात्मक वृत्ती ठेवावी. आपल्या चुका आपणच सुधारल्यास आणि ‘क्वालिटी’ अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. प्रशांत रोकडे म्हणाले, स्वप्न पहा, ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा, प्रामाणिक रहा, वेळेचे नियोजन करा, यश तुमच्या जवळ येईल.