शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

सावधान,आंबा झालाय विषारी

By admin | Updated: April 12, 2017 01:40 IST

कळमना बाजारपेठेत सध्या आंब्याची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे.

विक्रेत्यांवर कारवाई केव्हा? : अन्न व औषध प्रशासन सुस्तनागपूर : कळमना बाजारपेठेत सध्या आंब्याची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे. गडद पिवळ्या रंगाच्या आंब्याला जास्त भाव मिळत असल्यामुळे व्यापारी कार्बाईड रसायनाचा वापर करून आंबे पिकवत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. आंबे पिकविण्यासाठी रसायनाचा वापरअन्नधान्याप्रमाणे फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड प्रक्रियेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. आंबा लवकर पिकविण्यासाठी व त्याला गडद पिवळा रंग यावा, यासाठी आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडर टाकली जाते. ही पावडर पेटीत उष्णता निर्माण करते व आंब्याला चांगला रंग देते. व्यापारी या पावडरचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्यावर्षी कळमन्यात कारवाईदरम्यान विभागाने जवळपास २.५ लाख रुपयांचे आंबे जप्त केले होते. आंबे विषारी झाले आहेत. विषारी आंब्यावर विभाग कारवाई केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. यावर्षी कारवाईबाबत विभाग सुस्त आहे. गुढीपाडव्यानंतर सर्व प्रकारच्या आंब्याची आवक वाढली असून हातठेल्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सहसा सुरुवातीच्या दिवसात बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे गडद पिवळे नसतात. पण विक्रीसाठी उपलब्ध असलेले आंबे गडद पिवळ्या रंगाचे दिसत आहेत. हे आंबे रसायनाने पिकविलेले आहेत, असे ग्राहकांचे मत आहे. रसायनाचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन विभागाने कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)जीवावर उठणाऱ्यांना अभय नाहीरसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे वा अन्य फळे विकून पैसे कमावणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास आमचा विभाग सक्षम आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन अधिकारी तपासणी आणि कारवाई करतील. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. गैरप्रकार आढळले तर नागरिकांनी आमच्या कार्यालयाला माहिती द्यावी. मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.