शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

स्वाईन फ्लूविषयी जागरूक राहा

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे.

दीपक सावंत : राज्यात २९ मृत्यू, ११३ पॉझिटिव्हनागपूर : स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे. आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना जागरूक राहणाचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेनेही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिला.गुरुवारी भंडारा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वाईन फ्लूचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी उपसंचालक आरोग्य विभागाच्या नागपूर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून स्वाईन फ्लूची माहिती घेतली जात आहे. बुधवारी रात्री मेडिकलमध्ये बैठक घेतली. यात स्वाईन फ्लूचे जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते बाहेरच्या राज्यात जाऊन आले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय हवामानातील बदल, यावर्षी थंडीने गाठलेला उच्चांक, स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये झालेला बदल याविषयीही माहिती घेतली जात आहे. परंतु रुग्णवाढीचे अद्याप तरी अचूक कारण मिळालेले नाही. स्वाईन फ्लू रुग्णाचे ए, बी, सी, असे वर्गीकरण केले जात आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केंद्रेही वाढविण्यात आली आहेत. आशावर्कर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या आजाराविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत एक लाख टॅम्यूफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)सिकलसेल व किडनी प्रत्यारोपणचा जीवनदायीत समावेश!राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला येत्या मार्च महिन्यात तीन वर्षे होत आहे. आतापर्यंत या योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. किडनी प्रत्यारोपण आणि सिकलसेल रुग्णांना येणारा अडचणी लक्षात घेता या दोन्ही आजारांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन जुलैपर्यंत यात फेरबदल केले जातील, असेही डॉ. सावंत म्हणाले.