शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

स्वाईन फ्लूविषयी जागरूक राहा

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे.

दीपक सावंत : राज्यात २९ मृत्यू, ११३ पॉझिटिव्हनागपूर : स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे. आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना जागरूक राहणाचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेनेही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिला.गुरुवारी भंडारा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वाईन फ्लूचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी उपसंचालक आरोग्य विभागाच्या नागपूर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून स्वाईन फ्लूची माहिती घेतली जात आहे. बुधवारी रात्री मेडिकलमध्ये बैठक घेतली. यात स्वाईन फ्लूचे जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते बाहेरच्या राज्यात जाऊन आले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय हवामानातील बदल, यावर्षी थंडीने गाठलेला उच्चांक, स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये झालेला बदल याविषयीही माहिती घेतली जात आहे. परंतु रुग्णवाढीचे अद्याप तरी अचूक कारण मिळालेले नाही. स्वाईन फ्लू रुग्णाचे ए, बी, सी, असे वर्गीकरण केले जात आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केंद्रेही वाढविण्यात आली आहेत. आशावर्कर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या आजाराविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत एक लाख टॅम्यूफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)सिकलसेल व किडनी प्रत्यारोपणचा जीवनदायीत समावेश!राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला येत्या मार्च महिन्यात तीन वर्षे होत आहे. आतापर्यंत या योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. किडनी प्रत्यारोपण आणि सिकलसेल रुग्णांना येणारा अडचणी लक्षात घेता या दोन्ही आजारांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन जुलैपर्यंत यात फेरबदल केले जातील, असेही डॉ. सावंत म्हणाले.