शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 08:00 IST

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचा अंदाज यावरूनच येतो की राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. महावितरणच्या अहवालात याची नोंद असल्यामुळे याची माहिती महावितरणलाही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यानंतरही महावितरणने उपाययोजनेसाठी पुढाकार घेतलेला नाही.

महावितरणच्या अहवालात २२ जूनपर्यंतची स्थिती मांडण्यात आली आहे. यात जे कनेक्शन बंद असल्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत, अशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महावितरणचे अधिकारी व्यक्तिगत तक्रारी स्वीकारतात. मात्र, त्याच्यावर उपाय योजण्यात दिरंगाई करतात. बंद असलेल्यांमध्ये सर्वाधिक कनेक्शन नागपूर विभागातील (विदर्भ) आहेत. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी मुख्य अभियंत्यांना या बंद कनेक्शनकडे स्वत: लक्ष देऊन तत्काळ उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकारी काय म्हणतात?

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली स्थिती व वास्तव यात फरक असल्याचे सांगितले. बहुतांश बंद कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. फक्त लाइनमनने तक्रारी ‘क्लोज’ (बंद) केल्या नाहीत. त्यामुळे अहवालातील आकडा मोठा दिसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :electricityवीज