शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 08:00 IST

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचा अंदाज यावरूनच येतो की राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. महावितरणच्या अहवालात याची नोंद असल्यामुळे याची माहिती महावितरणलाही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यानंतरही महावितरणने उपाययोजनेसाठी पुढाकार घेतलेला नाही.

महावितरणच्या अहवालात २२ जूनपर्यंतची स्थिती मांडण्यात आली आहे. यात जे कनेक्शन बंद असल्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत, अशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महावितरणचे अधिकारी व्यक्तिगत तक्रारी स्वीकारतात. मात्र, त्याच्यावर उपाय योजण्यात दिरंगाई करतात. बंद असलेल्यांमध्ये सर्वाधिक कनेक्शन नागपूर विभागातील (विदर्भ) आहेत. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी मुख्य अभियंत्यांना या बंद कनेक्शनकडे स्वत: लक्ष देऊन तत्काळ उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकारी काय म्हणतात?

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली स्थिती व वास्तव यात फरक असल्याचे सांगितले. बहुतांश बंद कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. फक्त लाइनमनने तक्रारी ‘क्लोज’ (बंद) केल्या नाहीत. त्यामुळे अहवालातील आकडा मोठा दिसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :electricityवीज