शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

बॅटरी कारची सेवा अखेर बंद

By admin | Updated: April 28, 2016 02:42 IST

एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूूर रेल्वेस्थानकावर सुरू असलेली बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

निर्णय मागे घ्यावा : रुग्ण, अपंग अन् ज्येष्ठ नागरिकांची फरफटनागपूर : एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूूर रेल्वेस्थानकावर सुरू असलेली बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत असून त्यांच्या सुविधेसाठी, बंद करण्यात आलेली बॅटरी कार त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. उपराजधानीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्रासह विदर्भातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे कठीण होते. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने शहरातील एका समाजसेवीच्या माध्यमातून बॅटरी कारची व्यवस्था केली होती. ही कार बॅटरीवर चालत असून तिला विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून चार्जिंग करावे लागते. रोज सुमारे १०० च्या वर रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेतात. दिवसाकाठी ३०० ते ४०० कॉल या बॅटरी कारसाठी येतात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक सहायक वाणिज्य व्यवस्थापकांनी दोन्ही बॅटरी कार चालकांना सेवा बंद करण्याचे लेखी आदेश दिले. उन्हाळ््यात रेल्वेगाड्यांमध्ये प्रकृती बिघडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून दिवसाला सरासरी आठ ते दहा डॉक्टर कॉल्सची नोंद होत आहे, अशा स्थितीत बॅटरी कार बंद करून स्थानिक प्रशासन काय साध्य करणार आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त ‘डीआरएम’ ब्रिजेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोबाईल ‘रिसिव्ह’ न केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)प्रवाशांना ६५ रुपये भुर्दंडबॅटरी कारमुळे रुग्ण, अपंग प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क कोचपर्यंत जाण्याची सुविधा होती. परंतु आता रेल्वेस्थानकावर उपलब्ध असलेल्या व्हील चेअरमुळे कुलीच्या मदतीने कोचपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना ६५ रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकदा जवळ सामान असल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या रुग्णांना कुलीच्या साहाय्याने कोचपर्यंत घेऊन जातात. त्यामुळे हा अतिरिक्त भुर्दंड आता प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशासाठी ?रेल्वेस्थानकावर बॅटरी कारमुळे मोठा अपघात झाल्याची कुठलीही नोंद मागील तीन वर्षात झालेली नाही. त्यामुळे गरीब रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मदतीची ठरणाऱ्या बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेण्यात आला, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.