शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:26 IST

अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देनितीन गडकरींचे आवाहन : दहाव्या अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.दहाव्या अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर खासदास रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जैस्वाल, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड दिल्यास त्यांना चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कसे काम करता येईल, याचा विचार करावा. तणस, तुऱ्हाटी, बांबूपासून बायो सीएनजी तयार केल्यास त्यांना १ लाखाऐवजी ४० हजाराचे डिझेल लागेल. नागपुरात २५ कोटी रुपये खर्चुन शेतकºयांना प्रशिक्षण देणारे अ‍ॅग्रोव्हिजन ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कृत्रिम गर्भ तयार करून गाईची जात सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. यापुढे गार्इंना गोऱ्हेच होतील. प्रदर्शनातील पशु प्रदर्शनही लोकप्रिय झाल्याचे सांगून त्यांनी एकाही शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येऊ नये असा समृद्ध विदर्भ उभा राहण्यास या प्रदर्शनामुळे मदत झाल्याचे सांगितले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार रमेश मानकर यांनी मानले.उत्कृष्ट शेतकऱ्यांचा झाला गौरव 

अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनात ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून आदर्श निर्माण केला असा शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरविण्यात आले. यात अकोल्याचे आशिष आवटे, उमरेड येथील नितीन भिसे, कळमना येथील रवि कोरडे, अमरावती येथील नीता सावदे, नांदगाव खंडेश्वरच्या संगीता सावला यांचा समावेश आहे. यासोबतच अ‍ॅग्रो व्हिजन निबंध स्पर्धेत जयराम जाधव, प्रेमचंद शेडमाके, दीक्षा नागदेवते यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीNitin Gadkariनितीन गडकरी