शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:26 IST

अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देनितीन गडकरींचे आवाहन : दहाव्या अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.दहाव्या अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर खासदास रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जैस्वाल, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड दिल्यास त्यांना चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कसे काम करता येईल, याचा विचार करावा. तणस, तुऱ्हाटी, बांबूपासून बायो सीएनजी तयार केल्यास त्यांना १ लाखाऐवजी ४० हजाराचे डिझेल लागेल. नागपुरात २५ कोटी रुपये खर्चुन शेतकºयांना प्रशिक्षण देणारे अ‍ॅग्रोव्हिजन ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कृत्रिम गर्भ तयार करून गाईची जात सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. यापुढे गार्इंना गोऱ्हेच होतील. प्रदर्शनातील पशु प्रदर्शनही लोकप्रिय झाल्याचे सांगून त्यांनी एकाही शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येऊ नये असा समृद्ध विदर्भ उभा राहण्यास या प्रदर्शनामुळे मदत झाल्याचे सांगितले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार रमेश मानकर यांनी मानले.उत्कृष्ट शेतकऱ्यांचा झाला गौरव 

अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनात ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून आदर्श निर्माण केला असा शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरविण्यात आले. यात अकोल्याचे आशिष आवटे, उमरेड येथील नितीन भिसे, कळमना येथील रवि कोरडे, अमरावती येथील नीता सावदे, नांदगाव खंडेश्वरच्या संगीता सावला यांचा समावेश आहे. यासोबतच अ‍ॅग्रो व्हिजन निबंध स्पर्धेत जयराम जाधव, प्रेमचंद शेडमाके, दीक्षा नागदेवते यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीNitin Gadkariनितीन गडकरी