शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

आता बार्टीचे अस्तित्वही धोक्यात ? ८० कर्मचारी कपातीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:06 IST

Nagpur News सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले समता प्रतिष्ठान बारळगण्याची तयारी सुरु असतानाच आता स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक कार्यालयाचे महत्त्व घटणार 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले समता प्रतिष्ठान बारळगण्याची तयारी सुरु असतानाच आता स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. निधी नसल्याचे कारण सांगून प्रादेशिक विभागातील ८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागपुरातील बार्टीचे प्रादेशिक कार्यालयाचे महत्त्वच कमी होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही साामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. आपल्या नावाप्रमाणेच या संस्थेचे मुख्य कार्य संशोधन व प्रशिक्षणाचे आहे. यासोबतच बार्टीच्या कार्याची मोठी व्याप्ती आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थी शिक्षण व उच्च शिक्षणात अग्रेसर असतात. युपीएससी व एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षामध्ये अग्रेसर असतात. यात बार्टीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बार्टीचे हे कार्य लक्षात घेऊनच मराठा समाज व ओबीसी समाजातर्फे बार्टीच्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची मागणी केली जात हाेती. हे विशेष.

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने बजेटमध्ये कपात केली. सर्वच विभागांना याचा फटका बसला परंतु सामाजिक न्याय विभागाने मात्र निधी नसल्याच्या नावाखाली कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लाावला आहे. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीमध्ये सुद्धा कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तसे आदेशच जारी करण्यात आले आहेत.

नागपूरचे महत्त्व संपुष्टात

भाजपच्या काळात सामाजिक न्यायमंत्री हे विदर्भातील होते. त्यामुळे या भागात नागपूर हे महत्त्वाचे केंद्र ठरले होते. नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. दीक्षाभूमीला लागूनच साामाजिक न्याय भवनाची इमारत आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करताना याचे मुख्यालय नागपूरलाच ठेवण्यात आले. परंतु सत्ता बदलताच नागपूरचे महत्त्वही संपुष्टात आले. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीतही कर्मचारी कपात केली जात आहे. बार्टीचे नागपुरात प्रादेशिक कार्यालय आहे. कर्मचारी कपातीनंतर या प्रादेशिक कार्यालयाचे महत्त्वच संपणार आहे, हे विशेष.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र