शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बाप्पा निघाले...आज थाटात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:25 IST

गणपती आले आणि बघता-बघता ११ दिवसही पूर्ण झाले. घरगुती गणपतीचे दीड, पाच आणि सातव्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतांश गणपतीचे विसर्जन होणार आहे.

ठळक मुद्देविसर्जन बंदोबस्तासाठी चार हजार पोलीस : १० ठिकाणांवर विसर्जन व्यवस्था, एसआरपी आणि होमगार्डचाही सहभाग, सीसीटीव्हीची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती आले आणि बघता-बघता ११ दिवसही पूर्ण झाले. घरगुती गणपतीचे दीड, पाच आणि सातव्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतांश गणपतीचे विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ढोल-ताशांच्या निनादात गणरायाला निरोप द्यायला सोमवारी रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे.गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी सहा पोलीस उपायुक्त आणि सहा सहायक आयुक्तांसह चार हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना करतानाच एकूण १० ठिकाणांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी उपस्थित होते.यावर्षी शहरात एकूण १०६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली असून, अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. सोमवारी ४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या विसर्जनाला सुरुवात केली आहे. या मंडळांनी पोलीस परवानगी घेताना विसर्जनाची तारीख, मार्ग आणि ठिकाण ठरवून दिले होते. त्यानुसार ४ सप्टेंबरला ३४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडणार असून, मंगळवारी ५ सप्टेंबरला सर्वाधिक ६४९ मंडळांतर्फे श्रींच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. बुधवारी ६ सप्टेंबरला ३६९ तर गुरुवारी १७ सार्वजनिक मंडळांकडून बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड, गोंधळ होणार नाही, याची पोलिसांनी खास काळजी घेतली असून, बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सार्वजनिक आणि घरगुती मूर्र्तींच्या विसर्जन मिरवणुकीत तालवाद्य वाजवायची परवानगी असली तरी मर्यादित आवाजातच ते वाजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डीजेला परवानगी नाही, याचा पुनरुच्चार करून शांततेत आणि ठरवून दिलेल्या वेळेत सार्वजनिक मंडळांनी विसर्जन करावे, असे सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विसर्जनाच्या ठिकाणांपासून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आली आहे.विसर्जनाचे ठिकाणफुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, नाईक तलाव, कोराडी तलाव, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव, कळमना तलाव, महादेव घाट आणि वेणा नदी हिंगणा. विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणांवर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्तींचे येथे विसर्जन करण्याचे सुचविण्यात आले आहे.मनपा प्रशासन सज्ज,१९४ कृत्रिम तलावगणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. तलावाच्या ठिकाणी व शहरातील विविध भागात कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सोमवारी शहरातील तलाव व विसर्जन स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. फुटाळा, गांधीसागर व सक्करदरा, अंबाझरी, सोनेगाव तलावाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी सुधाकर कोहळे, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, राजू भिवगडे उपस्थित होते.१२०० कर्मचारी तैनातअनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सज्ज केले आहेत. विदर्भ सर्पमित्र मंडळ व रिव्हॉन या संस्थेचे ४० जलतरणपटू फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे कार्यरत आहेत. याशिवाय महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे १००० तर अग्निशमन विभागाचे २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.