शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

बँक ऑफ इंडियाने कमविला २५० कोटी नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

नागपूर : बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत २५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. ...

नागपूर : बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत २५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत बँकेला ३५७१.४१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. डिसेंबर २०२०-२१ ला समाप्त झालेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ५४०.७२ कोटींपेक्षा कमी असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत १२२१५.७८ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च २०२०-२१ च्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ११३७९.८४ कोटी रुपये होते. सन २०२०-२१ मध्ये बँकेला २१६०.३० कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. यापूर्वी मागील वर्षी बँकेला २९५६.८९ कोटींचे नुकसान झाले होते. २०२०-२१ मध्ये बँकेचे उत्पन्न कमी होऊन ४८०४०.९३ कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी बँकेने ४९०६६.३३ कोटी रुपये कमविले होते. एनपीएच्या प्रकरणात सुधारणा झाली आहे. मार्च २०२१ संपल्यानंतर बँकेचा ग्रॉस एनपीए १३.७७ टक्के राहिला. परंतु मागील वर्षी बँकेचा ग्रॉस एनपीए १४.७८ टक्के होता, तर ग्रॉस बॅड लोन्स ६१५४९.९३ कोटी रुपयांवरून कमी होऊन ५६५३४.९४ कोटी रुपये राहिले. नेट एनपीए किंवा बॅड लोन्समध्येही ३.३५ टक्के घसरण झाली. पूर्वी ही ३.८८ टक्के (१४३२०.१० कोटी रुपये) होती, अशी माहिती नागपूर झोनचे झोनल व्यवस्थापक संतोष एस. यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. (वा. प्र.)

............