शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पोलीस सुरक्षेत फरार झाले होते बंजाराचे कुटुंबीय ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST

फरारीमध्ये नागपूरला आला होता बंजारा : तपास अधिकारी दोषी असल्याचा पीडितांचा आरोप नागपूर : अनेक शहरात एजन्सी चालवून कोट्यवधींनी ...

फरारीमध्ये नागपूरला आला होता बंजारा : तपास अधिकारी दोषी असल्याचा पीडितांचा आरोप

नागपूर : अनेक शहरात एजन्सी चालवून कोट्यवधींनी फसवणूक करणारा सुभाष बंजारा फरार असताना अनेकदा कुटुंबीयांना भेटण्यासाठी नागपूरला आला होता. त्याची माहिती कळताच सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंजाराच्या अटकेसाठी काहीच केले नाही. बंजाराचे कृत्य समोर आल्यानंतर पीडीत पोलिसांना दोषी मानत आहेत.

‘लोकमत’ने बंजाराच्या दिल्लीतील वजीरपूरमध्ये २ हजार टॅक्सी चालकांना १२ ते १३ कोटींचा चुना लावून फरार झाल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नागपुरातील पीडित सदर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना दोषी ठरवीत आहेत. बंजाराच्या विरुद्ध १४ सप्टेंबरला सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे तो दिल्लीतही नागपूरच्या धर्तीवर फसवणूक करून फरार झाला. बंजाराची सासूरवाडी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड आहे. बंजारा कुटुंबीयांसोबत पूर्वी कळमन्यात राहत होता. त्यानंतर तो पोलीस लाईन टाकळीतील कामगारनगरात राहण्यासाठी आला. नागपुरातील पीडितांनी बंजारासोबत त्याच्या कुटुंबीयांचाही फसवणुकीत हात असल्याची शंका व्यक्त केली होती. परंतु पोलिसांनी बंजारासोबत मधूर संबंध असल्यामुळे कुटुंबीयांना आरोपी केले नाही. पीडितांनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही तपास अधिकाऱ्यांची भूमिका बदलली नाही. सदरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बंजाराच्या कुटुंबीयांनी नागपुरातून फरार होण्याची तयारी केली. ऐनवेळी त्याची माहिती पीडितांनी मिळाली. त्यांनी कामगारनगरात पोहोचून सदर पोलिसांना त्याची सूचना दिली. सदर पोलिसांनी पीडितांची काहीच मदत केली नाही. त्याचा लाभ घेऊन बंजाराच्या कुुटुंबीयांनी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. गिट्टीखदान पोलिसांनी पीडितांना दमदाटी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस बंजाराच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या वाहनातून सामानासह सोडण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत गेले होते. पोलिसांचे संरक्षण असल्यामुळे बंजारा नागपुरातही आला होता. येथून मुले आणि कुटुंबीयांना घेऊन दिल्लीला गेला. पीडितांनी बंजारा कुटुंबीयांना सोबत घेऊन जात असल्याची सूचना पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचीही चौकशी केली नाही. पीडित सदरच्या तपास अधिकाऱ्याला दोषी असल्याचे सांगून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करीत आहेत.

..............