शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी दरोडेखोर टोळी अडकली

By admin | Updated: November 5, 2015 03:29 IST

वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य

नागपूर : वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना रायपूरवरून नागपुरात आणण्यात आले. मो. इमरुल मो. साबीर खान (३२) आणि शनवर ऊर्फ मो. खलिद हक (२५) दोघेही बांगलादेश बागेरेहाट येथील रहिवासी आहेत. २९ आॅगस्ट रोजी ८ ते १० दरोडेखोरांनी सोनेगाव येथील बालकृष्ण मोगरे व त्यांची पत्नी आणि मुलीला बंधक बनवून दोन लाख रुपयांचा माल लुटून नेला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान रायपूर पोलिसांनी दरोड्यातील एका प्रकरणात आरोपींना अटक केली. त्यांनी साथीदारांच्या मदतीने सोनेगाव परिसरात दरोडा टाकण्याची कबुली दिली. इतर साथीदार बांगलादेशात पळून गेल्याचे सांगितले. रायपूर पोलिसांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींनाा नागपुरात आणण्यात आले. या टोळीत एक डझनपेक्षा अधिक सदस्य आहेत. सर्व बांगलादेशचे रहिवासी आहेत. ते अवैधपणे भारतीय सीमेत प्रवेश करतात. रेल्वेने देशातील मोठमोठ्या शहरात जातात. शहरात जाताना ते स्टेशनवर न उतरता स्टेशनपासून काही दूर अंतरावर उतरून रेल्वे रुळाने वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. एखादा बंगला दिसून येताच दरोडा टाकतात. दरोडा टाकल्यावर रुळावरूनच ते स्टेशनवर परत येतात आणि तेथून कुठल्याही रेल्वेने दुसऱ्या शहरात निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दरोड्याच्या घटनेची माहिती होताच पोलीस शहरात तपासणी करतात. पोलीस स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच आरोपी रवाना होतात.यामुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. या बांगलादेशी टोळीने अनेक शहरांमध्ये दरोडा टाकला आहे. त्यांचे साथीदार बांगलादेशात परत गेल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण जगताप, एपीआय ई.बी. पाटील, हवालदार संजय गुप्ता, राजेश काकडे, शिपाशी ज्ञानेश्वर बांते करीत आहेत. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ४स्टेशनवर संशयास्पद लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ तैनात असतात. रेल्वे रुळावर पायीसुद्धा गस्त होत असते. असे असतानाही त्यांच्या हाती कधीच मोठी टोळी लागलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असामाजिक तत्त्वसुद्धा मोठमोठ्या घटना घडवून अशाचप्रकारे फरार होतात.