शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बांगलादेशी दरोडेखोर टोळी अडकली

By admin | Updated: November 5, 2015 03:29 IST

वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य

नागपूर : वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना रायपूरवरून नागपुरात आणण्यात आले. मो. इमरुल मो. साबीर खान (३२) आणि शनवर ऊर्फ मो. खलिद हक (२५) दोघेही बांगलादेश बागेरेहाट येथील रहिवासी आहेत. २९ आॅगस्ट रोजी ८ ते १० दरोडेखोरांनी सोनेगाव येथील बालकृष्ण मोगरे व त्यांची पत्नी आणि मुलीला बंधक बनवून दोन लाख रुपयांचा माल लुटून नेला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान रायपूर पोलिसांनी दरोड्यातील एका प्रकरणात आरोपींना अटक केली. त्यांनी साथीदारांच्या मदतीने सोनेगाव परिसरात दरोडा टाकण्याची कबुली दिली. इतर साथीदार बांगलादेशात पळून गेल्याचे सांगितले. रायपूर पोलिसांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींनाा नागपुरात आणण्यात आले. या टोळीत एक डझनपेक्षा अधिक सदस्य आहेत. सर्व बांगलादेशचे रहिवासी आहेत. ते अवैधपणे भारतीय सीमेत प्रवेश करतात. रेल्वेने देशातील मोठमोठ्या शहरात जातात. शहरात जाताना ते स्टेशनवर न उतरता स्टेशनपासून काही दूर अंतरावर उतरून रेल्वे रुळाने वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. एखादा बंगला दिसून येताच दरोडा टाकतात. दरोडा टाकल्यावर रुळावरूनच ते स्टेशनवर परत येतात आणि तेथून कुठल्याही रेल्वेने दुसऱ्या शहरात निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दरोड्याच्या घटनेची माहिती होताच पोलीस शहरात तपासणी करतात. पोलीस स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच आरोपी रवाना होतात.यामुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. या बांगलादेशी टोळीने अनेक शहरांमध्ये दरोडा टाकला आहे. त्यांचे साथीदार बांगलादेशात परत गेल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण जगताप, एपीआय ई.बी. पाटील, हवालदार संजय गुप्ता, राजेश काकडे, शिपाशी ज्ञानेश्वर बांते करीत आहेत. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ४स्टेशनवर संशयास्पद लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ तैनात असतात. रेल्वे रुळावर पायीसुद्धा गस्त होत असते. असे असतानाही त्यांच्या हाती कधीच मोठी टोळी लागलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असामाजिक तत्त्वसुद्धा मोठमोठ्या घटना घडवून अशाचप्रकारे फरार होतात.