शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बांगलादेशी दरोडेखोर टोळी अडकली

By admin | Updated: November 5, 2015 03:29 IST

वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य

नागपूर : वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना रायपूरवरून नागपुरात आणण्यात आले. मो. इमरुल मो. साबीर खान (३२) आणि शनवर ऊर्फ मो. खलिद हक (२५) दोघेही बांगलादेश बागेरेहाट येथील रहिवासी आहेत. २९ आॅगस्ट रोजी ८ ते १० दरोडेखोरांनी सोनेगाव येथील बालकृष्ण मोगरे व त्यांची पत्नी आणि मुलीला बंधक बनवून दोन लाख रुपयांचा माल लुटून नेला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान रायपूर पोलिसांनी दरोड्यातील एका प्रकरणात आरोपींना अटक केली. त्यांनी साथीदारांच्या मदतीने सोनेगाव परिसरात दरोडा टाकण्याची कबुली दिली. इतर साथीदार बांगलादेशात पळून गेल्याचे सांगितले. रायपूर पोलिसांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींनाा नागपुरात आणण्यात आले. या टोळीत एक डझनपेक्षा अधिक सदस्य आहेत. सर्व बांगलादेशचे रहिवासी आहेत. ते अवैधपणे भारतीय सीमेत प्रवेश करतात. रेल्वेने देशातील मोठमोठ्या शहरात जातात. शहरात जाताना ते स्टेशनवर न उतरता स्टेशनपासून काही दूर अंतरावर उतरून रेल्वे रुळाने वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. एखादा बंगला दिसून येताच दरोडा टाकतात. दरोडा टाकल्यावर रुळावरूनच ते स्टेशनवर परत येतात आणि तेथून कुठल्याही रेल्वेने दुसऱ्या शहरात निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दरोड्याच्या घटनेची माहिती होताच पोलीस शहरात तपासणी करतात. पोलीस स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच आरोपी रवाना होतात.यामुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. या बांगलादेशी टोळीने अनेक शहरांमध्ये दरोडा टाकला आहे. त्यांचे साथीदार बांगलादेशात परत गेल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण जगताप, एपीआय ई.बी. पाटील, हवालदार संजय गुप्ता, राजेश काकडे, शिपाशी ज्ञानेश्वर बांते करीत आहेत. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ४स्टेशनवर संशयास्पद लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ तैनात असतात. रेल्वे रुळावर पायीसुद्धा गस्त होत असते. असे असतानाही त्यांच्या हाती कधीच मोठी टोळी लागलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असामाजिक तत्त्वसुद्धा मोठमोठ्या घटना घडवून अशाचप्रकारे फरार होतात.