शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 20:56 IST

विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदहा ते १२ कोटींचा व्यवसाय बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना नावाच्या संकटो जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू पुढे यायला लागले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रावर या महामारीची मार बसली असून, बेरोजगारी व व्यवसाय बुडीचे संकट निर्माण झाले आहे. विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.साधारणत: दिवाळीत तुळशीविवाह आटोपले की विवाह मुहूर्त काढले जातात. आपल्याकडील वातावरणीय स्थिती बघता, कृषी व्यवसायातील उसंत बघता आणि शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा विचार करता बहुतांश विवाह सोहळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होत असतात. एका दिवसाला एकाच शहरात हजारावर विवाह सोहळे होत असल्याचे चित्रही बघण्यात आले आहे. मंगलकार्यालय उपलब्ध नाहीत म्हणून देवळांमध्येच असे विवाहसोहळे उरकले गेल्याचेही वेळोवेळी बघण्यात आले आहे. विवाहसोहळा म्हणजे दोन कुटूंबीयांच्या नात्यांचा मजबूत बंध असण्यासोबतच अनेक रोजगारही देणारे ठरतात. त्यातील प्रमुख भाग म्हणजे बॅण्डपथकांचा असतो. नवरदेवाची वरात बॅण्ड, बाजा किंवा संदलच्या गजरात काढली जाते. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असल्याने, बॅण्डपथक या प्रसंगाला संस्मरणीय करत असतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण होताच अनेक अनेक विवाह सोहळे स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. १५ एप्रिलपर्यंतचे जवळपास सगळेच सोहळे पुढील अनुकुल स्थिती निर्माण होईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. अशा स्थितीत याच विवाहसोहळ्यांच्या भरवशावर जिवनयापन करणारे बॅण्डपथक बेरोजगारीशी भांडत असल्याचे चित्र आहे. नागपुरात साधारणत: लहान-मोठे मिळून १२ हजार वादक आहेत. या वादकांचे वेगवेगळे ग्रुप असून, या काळात हे बॅण्डपथक अतिशय व्यस्त असतात. दिवसाला तीन ते चार विवाहसोहळ्यांत त्यांचे वादन होत असते आणि हजारो रुपये कमावून घरी जात असतात. साधारणत: या काळात बॅण्डपथक व वाद्यवृंदांचा १२ ते १५ कोटी रुपयांचा व्यवसाय होत असतो. तो बुडाला असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनचा काळ आणखी वाढला तर कसे होईल, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.कोरोनाने सगळेच हिरावले, मदतीची गरज - लहानू इंगळे: हे तीन ते चार महिने बॅण्डपथक व वाद्यवृंदांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात संपूर्ण वर्षभराची कमाई होत असते. मात्र, नेमक्या याच महिन्यांत कोरोनाचे सावट निर्माण झाले आणि लॉकडाऊनमुळे आमचा धंदाच चौपट झाल्याची वेदना नागपूर बॅण्ड असोसिएशनचे सचिव लहानू इंगळे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कमाईचे नेमके महिने कोरडे जात असल्याने, वर्षभर अत्यंत बिकट स्थितीचा सामना वादकांना करावा लागणार आहे. अशा स्थितीत सरकारने आम्हा बॅण्डपथक व वाद्यवृंदांना मदत करणे गरजेचे असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली.१४०० पथक: शहरात नोंदणीकृत बॅण्डपथकांची संख्या ११० आहे आणि छोटे व मध्यम बॅण्ड पथक, संदल, पंजाबी ढोल व इतर पथकांची संख्या १३००च्या जवळपास आहे. प्रत्येक पथकात १० ते २० संख्येने वादकांची संख्या असते. हे पथक एका तासाच्या वादनासाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आकारणी करत असते. साधारणत: एकाच दिवसात तीन ते चार वादनाच्या कार्यक्रमातून ८० हजार ते १ लाख २० हजारापर्यंतची कमाई होत असते. कमाईचा काळ हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचाच असतो. जूनपासून पावसास सुरुवात होत असल्याने कमाई बंद असते. नेमक्या कमाईच्या काळातच धंदा चौपट झाल्याने बॅण्डपथक व वाद्यवृंद तणावात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस