शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीच्या ‘लाईव्ह’ प्रकारांवर बंदी घाला

By admin | Updated: December 16, 2015 03:11 IST

राज्यातील शेतकरी संकटात आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींकडून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात येते व प्रसारमाध्यमांच्या समोर शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.

नागपूर : राज्यातील शेतकरी संकटात आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींकडून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात येते व प्रसारमाध्यमांच्या समोर शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. बळीराजाला मदत अवश्य झाली पाहिजे, परंतु त्याचा दिखावा करणे अयोग्य आहे. राज्य शासनाने शेतकरी मदतीच्या अशा ‘लाईव्ह’ प्रकारांवर बंदी आणली पाहिजे अशी मागणी सत्तापक्ष तसेच विरोधी पक्षातर्फे सादर झालेल्या २६० अंतर्गतच्या दुष्काळाच्या चर्चेच्या प्रस्तावांवर सोमवारची चर्चा मंगळवारी सकाळी पुढे सुरू झाली. दुष्काळादरम्यान मराठवाड्यात माझे सातत्याने काम सुरू आहे. राज्य शासनातर्फे घोषित ‘पॅकेज’पैकी सर्वात कमी वाटा मराठवाड्याच्या वाट्याला आलेला आहे. शासकीय योजनांना हवी तशी गती मिळत नाही व याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. जलसंधारणाची कामे खोळंबली आहेत. जल लवादने मंजूर केलेले पाणी मराठवाड्याला मिळालेलेच नाही. दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण दूर सारून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे असे मत, जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी दुष्काळाच्या मुद्यावर शासनाला चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांमध्ये शासनाबाबत विश्वासार्हताच उरलेली नाही. मराठवाड्यावर तर केंद्र व राज्य शासन मिळून अन्याय करीत आहे. विदर्भातील जिल्हा सहकारी बँकांना ४१० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. विदर्भातील अनेक बँकांना थेट पंतप्रधान कार्यालयातर्फे मदत करण्यात आली आहे. सौरऊर्जा पंपांच्या वाटपातदेखील मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. पाच लाखांपैकी मराठवाड्याच्या वाट्याला अवघे ९०० सौरऊर्जा पंप आले, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना ‘सीएसआर’ अनिवार्य आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाचा पुढाकार आवश्यक असल्याची सूचनादेखील त्यांनी केली. भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी शासनाचे १ वर्ष व आघाडी शासनाची १५ वर्षे यांची तुलनाच केली. सत्तेवर आल्यापासून युती शासनाने शेतकऱ्यांना ५ हजार २५७ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर दुष्काळासंदर्भात यंदा ४ हजार कोटींचा प्रस्तावदेखील केंद्राकडे पाठविला आहे, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे समुपदेशनदेखील आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सभागृहाच्या नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारी ही चर्चा सव्वा दोन तास चालली. वेळेअभावी आता ही चर्चा बुधवारी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)