शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

उमरेडच्या शेतकऱ्याने फुलविले बांबूवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

अभय लांजेवार उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त ...

अभय लांजेवार

उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त फटका. अशा बिकट परिस्थितीत १५ वर्षे सोयाबीनसह अन्य पारंपरिक पिकांवरच लक्ष केंद्रित केले. ‘ना नफा, ना तोटा’ यात १५ वर्षे गेली. अशातच बांबूच्या उत्पादनाचा विचार पुढे आला. तब्बल २४ एकरात वनशेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. उमरेड निवासी रमेश प्रभाकर डुंभरे या शेतकऱ्याने ही किमया साधली. येथून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलापार-नाड (ता.भिवापूर) शिवाराच्या मध्यवर्ती व घनदाट परिसरात रमेश डुंभरे यांची शेती आहे. २४ एकरापैकी १७ एकरात बांबू वन त्यांनी फुलविले आहे. रमेश डुंभरे दागिण्यांच्या कलाकुसरीचे काम करतात. अशातच मित्र परिवाराने त्यांना हिंमत दिली. २००० ला तब्बल २४ एकर शेती घेतली. या पडीत शेतात १५ वर्षे पारंपरिक पिके घेतली. नदीकिनारी शेती असल्याने पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण पीक मातीत जात होते. दरवर्षी हेच दुखणे होते. अशातच पूर आणि हवामानाचा अभ्यास करीत बांबूचे उत्पादन करायचे ठरले. गडचिरोली, वड्याळी, नाशिक, कोल्हापूर असा संपूर्ण बांबूपट्टा पिंजून काढला. २०१८ ला नागपूरला बांबू विकास महामंडळ स्थापन झाले होते. त्यांच्याकडूनच सुमारे ४ हजार बेने आणले. दोन रांगेतील अंतर १० बाय १० ठेवले. मधातील एक रांग २० फुटांची आणि त्यात निलगिरीचे झाडे लावली. सातत्याने पाण्याची व्यवस्था या वनशेतीसाठी महत्त्वाची आहे. यामुळे विजेचीही समस्या सोडविली. रात्रंदिवस एक केला. आता या बांबूला तीन वर्षे झाले. साधारणत: ४ वर्षानंतर बांबू कापणीला येत असते. सध्या १७ एकरातील बांबू लक्षवेधी ठरत आहे. माझ्या या प्रवासात पत्नी रिंकू, डॉ. विजय इल्लुरकर, राजू चव्हाण, सुधाकर खानोरकर, शेखर भांडारकर आदींचे सहकार्य मोलाचे ठरले, असे रमेश डुंभरे यांनी सांगितले.

निलगिरी आणि सीताफळ बांबूसोबतच

रमेश डुंभरे यांनी उर्वरित ७ एकरात निलगिरी आणि सीताफळाचाही प्रयोग केला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या ४ ते ५ हजार निलगिरीच्याही झाडांची वाढ तारीफेकाबीलच आहे. शिवाय सीताफळांचीही लागवड शेतात अध्येमध्ये करीत या शेतकऱ्याने वनशेतीचा वसा जपला आहे.

---

रानडुकरांचा त्रास

परिसरात रानडुकरांचा त्रास अधिक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना बांबूचा प्रयोग करावयाचा आहे. त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम आपल्या शेताला सोलर कूंपन ताराची सुरक्षा गरजेची आहे. आधी सोलर लावा आणि मगच लागवण करा. बांबूची कोंबे निघाल्यानंतर रानडुक्कर ही कोंब उपटून फेकतात. यामुळे नुकसान होते. बांबू उत्पादनासाठी एकरी वर्षाला एक लाख रुपयांचा खर्च लागतो.