शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या शेतकऱ्याने फुलविले बांबूवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

अभय लांजेवार उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त ...

अभय लांजेवार

उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त फटका. अशा बिकट परिस्थितीत १५ वर्षे सोयाबीनसह अन्य पारंपरिक पिकांवरच लक्ष केंद्रित केले. ‘ना नफा, ना तोटा’ यात १५ वर्षे गेली. अशातच बांबूच्या उत्पादनाचा विचार पुढे आला. तब्बल २४ एकरात वनशेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. उमरेड निवासी रमेश प्रभाकर डुंभरे या शेतकऱ्याने ही किमया साधली. येथून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलापार-नाड (ता.भिवापूर) शिवाराच्या मध्यवर्ती व घनदाट परिसरात रमेश डुंभरे यांची शेती आहे. २४ एकरापैकी १७ एकरात बांबू वन त्यांनी फुलविले आहे. रमेश डुंभरे दागिण्यांच्या कलाकुसरीचे काम करतात. अशातच मित्र परिवाराने त्यांना हिंमत दिली. २००० ला तब्बल २४ एकर शेती घेतली. या पडीत शेतात १५ वर्षे पारंपरिक पिके घेतली. नदीकिनारी शेती असल्याने पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण पीक मातीत जात होते. दरवर्षी हेच दुखणे होते. अशातच पूर आणि हवामानाचा अभ्यास करीत बांबूचे उत्पादन करायचे ठरले. गडचिरोली, वड्याळी, नाशिक, कोल्हापूर असा संपूर्ण बांबूपट्टा पिंजून काढला. २०१८ ला नागपूरला बांबू विकास महामंडळ स्थापन झाले होते. त्यांच्याकडूनच सुमारे ४ हजार बेने आणले. दोन रांगेतील अंतर १० बाय १० ठेवले. मधातील एक रांग २० फुटांची आणि त्यात निलगिरीचे झाडे लावली. सातत्याने पाण्याची व्यवस्था या वनशेतीसाठी महत्त्वाची आहे. यामुळे विजेचीही समस्या सोडविली. रात्रंदिवस एक केला. आता या बांबूला तीन वर्षे झाले. साधारणत: ४ वर्षानंतर बांबू कापणीला येत असते. सध्या १७ एकरातील बांबू लक्षवेधी ठरत आहे. माझ्या या प्रवासात पत्नी रिंकू, डॉ. विजय इल्लुरकर, राजू चव्हाण, सुधाकर खानोरकर, शेखर भांडारकर आदींचे सहकार्य मोलाचे ठरले, असे रमेश डुंभरे यांनी सांगितले.

निलगिरी आणि सीताफळ बांबूसोबतच

रमेश डुंभरे यांनी उर्वरित ७ एकरात निलगिरी आणि सीताफळाचाही प्रयोग केला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या ४ ते ५ हजार निलगिरीच्याही झाडांची वाढ तारीफेकाबीलच आहे. शिवाय सीताफळांचीही लागवड शेतात अध्येमध्ये करीत या शेतकऱ्याने वनशेतीचा वसा जपला आहे.

---

रानडुकरांचा त्रास

परिसरात रानडुकरांचा त्रास अधिक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना बांबूचा प्रयोग करावयाचा आहे. त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम आपल्या शेताला सोलर कूंपन ताराची सुरक्षा गरजेची आहे. आधी सोलर लावा आणि मगच लागवण करा. बांबूची कोंबे निघाल्यानंतर रानडुक्कर ही कोंब उपटून फेकतात. यामुळे नुकसान होते. बांबू उत्पादनासाठी एकरी वर्षाला एक लाख रुपयांचा खर्च लागतो.