शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे आरोग्यच नाही तर आसपासच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत. मात्र धोकादायक राखेचे हे प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीच्या वैज्ञानिकांनी जबरदस्त उपाय करून दाखवला आहे. नीरीच्या ‘इको रिज्युविनेशन टेक्नालॉजी’ (ईआरटी)च्या माध्यमातून या दोन्ही वीज केंद्रांच्या राखेवर १०० एकरच्या परिसरात बांबूची लागवड केली आहे. राखेवर ३०-३५ फूट वाढलेल्या हजारो झाडांचे बांबूवन पाहून राखेवर काहीच उगवत नाही, हा समज खोटा ठरवला आहे.

औष्णिक विद्युत केंद्रात जळणाऱ्या कोळशापासून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) ही वायुप्रदूषणाचे अतिशय धोकादायक कारण आहे. राखेमध्ये असलेल्या जड धातूंमुळे कॅन्सर व इतर भीषण आजार होण्याचा धोका असतो. शिवाय ही राख पिकांनाही हानिकारक असते. कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्राच्या परिसरातील नागरिकांना हा धोका सहन करावा लागत असून शेकडो एकर शेतातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे या राखेचे प्रदूषण रोखणे हे महाजेनको प्रशासन आणि वैज्ञानिकांसमोरही आव्हान ठरले होते. नीरीच्या वैज्ञानिकांनी राखेचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा यशस्वी मार्ग शोधला आहे. सीएसआयआर-नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. लाल सिंग यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने २०१३ पासून हा प्रयोग सुरू केला, जो आज यशस्वी ठरला आहे.

विशेष बॅक्टेरिया व फन्जॉयचा वापर

कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातून दररोज १६ ते १७ हजार टन कोळसा जाळला जातो व त्याच्या ज्वलनातून हजारो टन राख बाहेर पडते. कोराडीच्या ९० एकरात व खापरखेड्याच्या ४४२ एकरामध्ये राखेचे ढिगारे पसरलेले आहेत. डॉ. लाल सिंग यांच्या टीमने कोराडी मंदिरासमोर ३० एकर व कोराडी तलावाजवळ ३० एकर, आणि खापरखेडामध्ये ४० एकरात पसरलेल्या राखेत खड्डे तयार करून त्यात ईआरटी तंत्रज्ञानासह विशेष बॅक्टेरिया व फन्जाॅय टाकून हजाराे कमर्शियल बांबूंची लागवड केली. आज या दाेन्ही ठिकाणी बांबूवन बहरले आहे. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेना नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेणा नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले.

- काेराडी, खापरखेड्यात ५३२ एकरात फ्लाय ॲशचे ढिगारे

- विदर्भात १२००० एकरात फ्लाय ॲश पसरलेली.

- भारतात ६५००० एकर भूमी फ्लाय ॲशच्या विळख्यात.

- ईआरटी तंत्रज्ञानाद्वारे बांबू लागवडीसाठी पीट तयार करून त्यात बॅक्टेरिया व फन्जाॅयचा वापर.

- पीटमध्ये ट्रिटमेंट. बांबूची वाढ दुपटीने.

- १० एकरासाठी २० याप्रमाणे गावातील २००० महिलांना प्रत्यक्ष राेजगार मिळाला.

- राखेमुळे हाेणारे वायुप्रदूषण, जलप्रदूषण राेखण्यात यश.

- जमिनीची सुपिकता शाबूत. आसपासच्या शेकडाे एकरातील पिकेही सुरक्षित.