शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे आरोग्यच नाही तर आसपासच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत. मात्र धोकादायक राखेचे हे प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीच्या वैज्ञानिकांनी जबरदस्त उपाय करून दाखवला आहे. नीरीच्या ‘इको रिज्युविनेशन टेक्नालॉजी’ (ईआरटी)च्या माध्यमातून या दोन्ही वीज केंद्रांच्या राखेवर १०० एकरच्या परिसरात बांबूची लागवड केली आहे. राखेवर ३०-३५ फूट वाढलेल्या हजारो झाडांचे बांबूवन पाहून राखेवर काहीच उगवत नाही, हा समज खोटा ठरवला आहे.

औष्णिक विद्युत केंद्रात जळणाऱ्या कोळशापासून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) ही वायुप्रदूषणाचे अतिशय धोकादायक कारण आहे. राखेमध्ये असलेल्या जड धातूंमुळे कॅन्सर व इतर भीषण आजार होण्याचा धोका असतो. शिवाय ही राख पिकांनाही हानिकारक असते. कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्राच्या परिसरातील नागरिकांना हा धोका सहन करावा लागत असून शेकडो एकर शेतातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे या राखेचे प्रदूषण रोखणे हे महाजेनको प्रशासन आणि वैज्ञानिकांसमोरही आव्हान ठरले होते. नीरीच्या वैज्ञानिकांनी राखेचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा यशस्वी मार्ग शोधला आहे. सीएसआयआर-नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. लाल सिंग यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने २०१३ पासून हा प्रयोग सुरू केला, जो आज यशस्वी ठरला आहे.

विशेष बॅक्टेरिया व फन्जॉयचा वापर

कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातून दररोज १६ ते १७ हजार टन कोळसा जाळला जातो व त्याच्या ज्वलनातून हजारो टन राख बाहेर पडते. कोराडीच्या ९० एकरात व खापरखेड्याच्या ४४२ एकरामध्ये राखेचे ढिगारे पसरलेले आहेत. डॉ. लाल सिंग यांच्या टीमने कोराडी मंदिरासमोर ३० एकर व कोराडी तलावाजवळ ३० एकर, आणि खापरखेडामध्ये ४० एकरात पसरलेल्या राखेत खड्डे तयार करून त्यात ईआरटी तंत्रज्ञानासह विशेष बॅक्टेरिया व फन्जाॅय टाकून हजाराे कमर्शियल बांबूंची लागवड केली. आज या दाेन्ही ठिकाणी बांबूवन बहरले आहे. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेना नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेणा नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले.

- काेराडी, खापरखेड्यात ५३२ एकरात फ्लाय ॲशचे ढिगारे

- विदर्भात १२००० एकरात फ्लाय ॲश पसरलेली.

- भारतात ६५००० एकर भूमी फ्लाय ॲशच्या विळख्यात.

- ईआरटी तंत्रज्ञानाद्वारे बांबू लागवडीसाठी पीट तयार करून त्यात बॅक्टेरिया व फन्जाॅयचा वापर.

- पीटमध्ये ट्रिटमेंट. बांबूची वाढ दुपटीने.

- १० एकरासाठी २० याप्रमाणे गावातील २००० महिलांना प्रत्यक्ष राेजगार मिळाला.

- राखेमुळे हाेणारे वायुप्रदूषण, जलप्रदूषण राेखण्यात यश.

- जमिनीची सुपिकता शाबूत. आसपासच्या शेकडाे एकरातील पिकेही सुरक्षित.