शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे आरोग्यच नाही तर आसपासच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत. मात्र धोकादायक राखेचे हे प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीच्या वैज्ञानिकांनी जबरदस्त उपाय करून दाखवला आहे. नीरीच्या ‘इको रिज्युविनेशन टेक्नालॉजी’ (ईआरटी)च्या माध्यमातून या दोन्ही वीज केंद्रांच्या राखेवर १०० एकरच्या परिसरात बांबूची लागवड केली आहे. राखेवर ३०-३५ फूट वाढलेल्या हजारो झाडांचे बांबूवन पाहून राखेवर काहीच उगवत नाही, हा समज खोटा ठरवला आहे.

औष्णिक विद्युत केंद्रात जळणाऱ्या कोळशापासून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) ही वायुप्रदूषणाचे अतिशय धोकादायक कारण आहे. राखेमध्ये असलेल्या जड धातूंमुळे कॅन्सर व इतर भीषण आजार होण्याचा धोका असतो. शिवाय ही राख पिकांनाही हानिकारक असते. कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्राच्या परिसरातील नागरिकांना हा धोका सहन करावा लागत असून शेकडो एकर शेतातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे या राखेचे प्रदूषण रोखणे हे महाजेनको प्रशासन आणि वैज्ञानिकांसमोरही आव्हान ठरले होते. नीरीच्या वैज्ञानिकांनी राखेचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा यशस्वी मार्ग शोधला आहे. सीएसआयआर-नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. लाल सिंग यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने २०१३ पासून हा प्रयोग सुरू केला, जो आज यशस्वी ठरला आहे.

विशेष बॅक्टेरिया व फन्जॉयचा वापर

कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातून दररोज १६ ते १७ हजार टन कोळसा जाळला जातो व त्याच्या ज्वलनातून हजारो टन राख बाहेर पडते. कोराडीच्या ९० एकरात व खापरखेड्याच्या ४४२ एकरामध्ये राखेचे ढिगारे पसरलेले आहेत. डॉ. लाल सिंग यांच्या टीमने कोराडी मंदिरासमोर ३० एकर व कोराडी तलावाजवळ ३० एकर, आणि खापरखेडामध्ये ४० एकरात पसरलेल्या राखेत खड्डे तयार करून त्यात ईआरटी तंत्रज्ञानासह विशेष बॅक्टेरिया व फन्जाॅय टाकून हजाराे कमर्शियल बांबूंची लागवड केली. आज या दाेन्ही ठिकाणी बांबूवन बहरले आहे. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेना नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेणा नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले.

- काेराडी, खापरखेड्यात ५३२ एकरात फ्लाय ॲशचे ढिगारे

- विदर्भात १२००० एकरात फ्लाय ॲश पसरलेली.

- भारतात ६५००० एकर भूमी फ्लाय ॲशच्या विळख्यात.

- ईआरटी तंत्रज्ञानाद्वारे बांबू लागवडीसाठी पीट तयार करून त्यात बॅक्टेरिया व फन्जाॅयचा वापर.

- पीटमध्ये ट्रिटमेंट. बांबूची वाढ दुपटीने.

- १० एकरासाठी २० याप्रमाणे गावातील २००० महिलांना प्रत्यक्ष राेजगार मिळाला.

- राखेमुळे हाेणारे वायुप्रदूषण, जलप्रदूषण राेखण्यात यश.

- जमिनीची सुपिकता शाबूत. आसपासच्या शेकडाे एकरातील पिकेही सुरक्षित.