शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बालदिनाची गंमतच न्यारी...

By admin | Updated: November 14, 2014 00:49 IST

बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच

बच्चे कंपनीमध्ये उत्साह कायम : पारंपरिक समारंभांना आधुनिकतेचा साजनागपूर : बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच मिळणाऱ्या गोष्टी आजच्या चिमुकल्यांना अगदी सहजतेने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे ‘दिवस’ फारसे महत्त्वाचे राहिले नाही, अशी टीका वारंवार करण्यात येते. परंतु जुन्या पिढीने अनुभवलेला तोच आनंद आजच्या ‘हायटेक’ बालकांच्या चेहऱ्यावरदेखील अनुभवायला मिळतो. प्रत्यक्षात पाहिले नसले तरी आजही बालकांना ‘चाचा नेहरू’ जवळचे अन् हक्काचे वाटतात. १४ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीत जरी आमूलाग्र बदल होत असले तरी उत्साह अन् त्यातील गाभा मात्र आजही कायम आहे. उपराजधानीच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला बालदिन म्हणजे स्वत:च्या हक्काचा दिवस आहे याची जाणीव आहे.एक काळ होता जेव्हा ‘बालदिन’ येण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पहायचे. एरवी रागावणारे शिक्षक, पालक यादिवशी विद्यार्थ्यांशी अगदी शांतपणे बोलायचे. शिवाय ज्या हातांनी धपाटे घातले जायचे, त्यांच्याकडूनच खाऊ मिळायचा. त्यामुळे बालदिनाच्या तयारीत बच्चे कंपनी मनापासून गुंतायची. काळ बदलला, अन् शिक्षणपद्धतीदेखील. आता धपाटे तर दूरच राहिले विद्यार्थ्यांना साधे रागवतानादेखील शिक्षकांना चार वेळा विचार करावा लागतो. जुन्या काळातील खाऊ तर कधीच ‘आऊटडेटेड’ झाला आहे. आता तर तोंडातून शब्द काढायचा अवकाश, की काही क्षणांतच हवी ती गोष्ट मिळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु इतके असले तरी बालदिन म्हणजे बालकांच्या हक्काचाच दिवस. त्यामुळे बदललेल्या स्वरूपातदेखील त्याच उत्साहात हा दिवस साजरा होतो. विद्यार्थ्यांची विधायक मानसिकतामागील पिढीपेक्षा आताच्या पिढीतील बालके जास्त ‘शार्प’ असल्याचे म्हटल्या जाते. एखादा दिवसाचा इतिहास त्यांना एखादे वेळी माहीत नसेल, परंतु त्यातील भावना मात्र ते नक्कीच जाणतात. आपल्या हक्काचाच दिवस म्हटल्यावर ते त्याला आणखी संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करतात. वंचित बालकांसाठी मदत गोळा करण्याचा विचार याच विद्यार्थ्यांच्या डोक्यातून येतो अन् ते त्यावर झटपट कामालादेखील लागतात. शहरातील निरनिराळ्या शाळांमधून हे चित्र पहायला मिळत आहे. अगदी घरीदेखील एकट्याने हा दिवस साजरा न करता ‘ग्रुप’मध्ये एकत्र येऊन बच्चे कंपनी धम्माल करताना दिसून येते. (प्रतिनिधी)चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारतेयमुळात आजची ‘जनरेशन’ वेगवान आहे. शिवाय बदलत्या काळात विचारांमध्येदेखील बदल दिसून येत आहेत. एखादा दिवस साजरा करायचा म्हणजे त्याचे ‘प्लॅनिंग’ यांच्या डोक्यात अगोदरपासूनच सुरू होते. शिवाय मदतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान व निरनिराळी ‘गॅजेट्स’ आहेतच. घरूनदेखील सहकार्य मिळते. यामुळे चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारत आहेत. लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याची पद्धतदेखील बदलत आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभिषेक मामेर्डे यांनी व्यक्त केले. शहरांतील शाळांमध्ये ‘फुल्ल आॅन’ उत्साहशुक्रवारी होणाऱ्या बालदिनासाठी शहरातील शाळांमध्ये निरनिराळे उपक्रम घेण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला आदरांजली तर वाहण्यात येणारच आहे. शिवाय कथाकथन, चित्रकला स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा असे उपक्रम तर आहेतच. परंतु यासोबतच कुठे ‘सायंटिफिक स्लोगन’ कुठे चक्क ‘एसएमएस’वर शुभेच्छा देण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. काही शाळांतर्फे विज्ञानविषयक माहितींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.