शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

बालदिनाची गंमतच न्यारी...

By admin | Updated: November 14, 2014 00:49 IST

बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच

बच्चे कंपनीमध्ये उत्साह कायम : पारंपरिक समारंभांना आधुनिकतेचा साजनागपूर : बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच मिळणाऱ्या गोष्टी आजच्या चिमुकल्यांना अगदी सहजतेने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे ‘दिवस’ फारसे महत्त्वाचे राहिले नाही, अशी टीका वारंवार करण्यात येते. परंतु जुन्या पिढीने अनुभवलेला तोच आनंद आजच्या ‘हायटेक’ बालकांच्या चेहऱ्यावरदेखील अनुभवायला मिळतो. प्रत्यक्षात पाहिले नसले तरी आजही बालकांना ‘चाचा नेहरू’ जवळचे अन् हक्काचे वाटतात. १४ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीत जरी आमूलाग्र बदल होत असले तरी उत्साह अन् त्यातील गाभा मात्र आजही कायम आहे. उपराजधानीच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला बालदिन म्हणजे स्वत:च्या हक्काचा दिवस आहे याची जाणीव आहे.एक काळ होता जेव्हा ‘बालदिन’ येण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पहायचे. एरवी रागावणारे शिक्षक, पालक यादिवशी विद्यार्थ्यांशी अगदी शांतपणे बोलायचे. शिवाय ज्या हातांनी धपाटे घातले जायचे, त्यांच्याकडूनच खाऊ मिळायचा. त्यामुळे बालदिनाच्या तयारीत बच्चे कंपनी मनापासून गुंतायची. काळ बदलला, अन् शिक्षणपद्धतीदेखील. आता धपाटे तर दूरच राहिले विद्यार्थ्यांना साधे रागवतानादेखील शिक्षकांना चार वेळा विचार करावा लागतो. जुन्या काळातील खाऊ तर कधीच ‘आऊटडेटेड’ झाला आहे. आता तर तोंडातून शब्द काढायचा अवकाश, की काही क्षणांतच हवी ती गोष्ट मिळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु इतके असले तरी बालदिन म्हणजे बालकांच्या हक्काचाच दिवस. त्यामुळे बदललेल्या स्वरूपातदेखील त्याच उत्साहात हा दिवस साजरा होतो. विद्यार्थ्यांची विधायक मानसिकतामागील पिढीपेक्षा आताच्या पिढीतील बालके जास्त ‘शार्प’ असल्याचे म्हटल्या जाते. एखादा दिवसाचा इतिहास त्यांना एखादे वेळी माहीत नसेल, परंतु त्यातील भावना मात्र ते नक्कीच जाणतात. आपल्या हक्काचाच दिवस म्हटल्यावर ते त्याला आणखी संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करतात. वंचित बालकांसाठी मदत गोळा करण्याचा विचार याच विद्यार्थ्यांच्या डोक्यातून येतो अन् ते त्यावर झटपट कामालादेखील लागतात. शहरातील निरनिराळ्या शाळांमधून हे चित्र पहायला मिळत आहे. अगदी घरीदेखील एकट्याने हा दिवस साजरा न करता ‘ग्रुप’मध्ये एकत्र येऊन बच्चे कंपनी धम्माल करताना दिसून येते. (प्रतिनिधी)चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारतेयमुळात आजची ‘जनरेशन’ वेगवान आहे. शिवाय बदलत्या काळात विचारांमध्येदेखील बदल दिसून येत आहेत. एखादा दिवस साजरा करायचा म्हणजे त्याचे ‘प्लॅनिंग’ यांच्या डोक्यात अगोदरपासूनच सुरू होते. शिवाय मदतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान व निरनिराळी ‘गॅजेट्स’ आहेतच. घरूनदेखील सहकार्य मिळते. यामुळे चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारत आहेत. लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याची पद्धतदेखील बदलत आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभिषेक मामेर्डे यांनी व्यक्त केले. शहरांतील शाळांमध्ये ‘फुल्ल आॅन’ उत्साहशुक्रवारी होणाऱ्या बालदिनासाठी शहरातील शाळांमध्ये निरनिराळे उपक्रम घेण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला आदरांजली तर वाहण्यात येणारच आहे. शिवाय कथाकथन, चित्रकला स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा असे उपक्रम तर आहेतच. परंतु यासोबतच कुठे ‘सायंटिफिक स्लोगन’ कुठे चक्क ‘एसएमएस’वर शुभेच्छा देण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. काही शाळांतर्फे विज्ञानविषयक माहितींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.