शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या विकासासाठी बालसदन सज्ज

By admin | Updated: December 28, 2016 03:27 IST

विदर्भ साहाय्यता समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालग्राम व बालसदनला मुलांची काळजी व संरक्षण या अंतर्गत महिला

महिला व बालविकास विभागाची मान्यता : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश नागपूर : विदर्भ साहाय्यता समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालग्राम व बालसदनला मुलांची काळजी व संरक्षण या अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बालसदनचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी मंगळवारी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विदर्भ साहाय्यता समितीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बालसदन व बालग्रामला नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे दैनदिन कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. तसेच बालसंगोपन व अनाथ मुलांच्या संगोपनासाठी कार्य करण्यावर बंधने आली होती. विभागीय आयुक्तांनी बालसदनच्या नोंदणीसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे बालसंगोपन पूर्ण क्षमतेने करणे यापुढे सुलभ होणार आहे. विदर्भ साहाय्यता समितीचे काटोल रोड येथील बालसदन सुरू व्हावे यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी बालसदन बचाव समिती गठित केली होती. सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अ‍ॅड. विनोद जयस्वाल, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रशांत पवार आदींनी विभागीय आयुक्तांना भेटून बालसदन सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागातर्फे नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याची कार्यवाही विदर्भ साहाय्यता समितीचे सरकार्यवाह व महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली. विदर्भ साहाय्यता समितीच्या कार्यकारिणी बैठकीत महिला व बालकल्याण विभाग पुणे यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र करून घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आली. संस्थेच्या परिसरात वसतिगृहाचे बांधकाम, बहुउद्देशीय सभागृह चालविणे, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश देणे, तसेच बालसंगोपन व अनाथ मुलांसाठी शैक्षणिक व बौध्दिक उपक्रम राबविण्यास ही या बैठकीत मान्यता देण्यात आली.(प्रतिनिधी)