शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, असा शब्द देण्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारले जाणारे गोंडवाना ‘थीम पार्क’ हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही दिली.

स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नामकरण आणि त्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले. अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्यानाच्या नामकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या नामकरणावरून कुणीही नाराज होण्याचे किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आदिवासींची संस्कृती जोपासण्याचे काम या प्रकल्पामध्ये होईल. या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल.

मागील दहा वर्षांच्या नस्ती विरोधकांनी तपासाव्यात. त्यात कुठेही गोंडवाना असे नाव देण्याचा उल्लेख नाही, असे आवाहन संजय राठोड यांनी

केले. एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविक केले तर आभार ऋषिकेश रंजन यांनी मानले.

...

गोसेखुर्दच्या पाण्याने गैरसमज धुऊन काढायचाय

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भाबाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये. या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. आता गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुऊन काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण १ मे रोजी करण्याचा आणि सुरजागडचा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

...

मुख्यमंत्री प्रसार माध्यमांना घाबरले का?

कोरोनाचे कारण दर्शवून या उद्घाटन समारंभापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले. निमंत्रिकाही नव्हत्या. त्यामुळे कुणीही पत्रकार उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री सचिवालयातूनच असे आदेश असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्रकारांची ॲलर्जी आहे की काय, असा सूर उमटत होता. दोन दिवसांपूर्वीच शंभरांवर पत्रकारांना एकत्रित बोलावून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा कोरोना नव्हता का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

...