शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, असा शब्द देण्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारले जाणारे गोंडवाना ‘थीम पार्क’ हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही दिली.

स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नामकरण आणि त्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले. अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्यानाच्या नामकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या नामकरणावरून कुणीही नाराज होण्याचे किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आदिवासींची संस्कृती जोपासण्याचे काम या प्रकल्पामध्ये होईल. या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल.

मागील दहा वर्षांच्या नस्ती विरोधकांनी तपासाव्यात. त्यात कुठेही गोंडवाना असे नाव देण्याचा उल्लेख नाही, असे आवाहन संजय राठोड यांनी

केले. एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविक केले तर आभार ऋषिकेश रंजन यांनी मानले.

...

गोसेखुर्दच्या पाण्याने गैरसमज धुऊन काढायचाय

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भाबाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये. या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. आता गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुऊन काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण १ मे रोजी करण्याचा आणि सुरजागडचा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

...

मुख्यमंत्री प्रसार माध्यमांना घाबरले का?

कोरोनाचे कारण दर्शवून या उद्घाटन समारंभापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले. निमंत्रिकाही नव्हत्या. त्यामुळे कुणीही पत्रकार उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री सचिवालयातूनच असे आदेश असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्रकारांची ॲलर्जी आहे की काय, असा सूर उमटत होता. दोन दिवसांपूर्वीच शंभरांवर पत्रकारांना एकत्रित बोलावून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा कोरोना नव्हता का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

...