शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

अ‍ॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजनांचा एल्गार

By admin | Updated: January 15, 2017 02:13 IST

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी,

बहुजन क्रांती मोर्चा : दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजबांधवांचा सहभाग नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी, भटके विमुक्तांनाही अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण देण्यात यावे, आदी विविध मागण्यासांठी शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी आदी समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेशीमबाग चौक येथून निघालेला हा मोर्चा अशोक चौक, बैद्यनाथ चौक, सीताबर्डी, व्हेरायटी चौकमार्गे संविधान चौक येथे पोहोचला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी रेशीमबाग मैदान येथे जाहीर सभा पार पडली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी होते. या सभेला भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट शिथिल करण्याचे षड्यंत्र सरकार रचत आहे. परंतु या कायद्यातील एक ऊकार किंवा स्वल्पविराम सुद्धा कमी केला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा व ओबीसी आणि दलित बांधवांमध्ये सरकार भांडण लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी भदंत सुरेई ससाई, रवी शेंडे, नारायण बागडे, अर्चना भोयर, श्रीधर साळवे, सुनील पेंदारे, प्रा. रमेश पिसे, मंगेश गेडाम, रेव्हरंड, गायकवाड, इमाम मसुद, मौलाना हफीज असरफ आदींनीही मार्गदर्शन केले. मोर्चात भीमराव फुसे, देवेंद्र घरडे, अमोल वाकुडकर, वंदना बेंजामिन, स्मिता कांबळे, बबिता मेहर, यशवंत मेश्राम, आकाश दुपारे, प्रवीण कांबळे, नागोराव धोंडे, अविनाश निमकर, डॉ. प्रफुल्ल मेश्राम, सुषमा भड, अरुण गाडे आदींसह जवळपास ४६८ संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चा जनआंदोलनाचे रूप घेणार बहुजन क्रांती मोर्चा हा विविध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले एक व्यासपीठ असून त्याला जनआंदोलनाचे रूप देण्यात येणार आहे, अशी माहिती बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. येत्या २१ तारखेला मुंबईत याचा समारोप होईल. त्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जातील. यानंतर देशातील ३१ राज्यांमध्ये आणि जवळपास ५०० जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्यात येईल. या माध्यमातून जवळपास सहा लाख गावांपर्यंत पाहोचण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक गावात या मोर्चाची एक शाखा तयार केली जाईल. जोपर्यंत आमच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असेही वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले.