शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

यंदा नागपुरात ‘बच्चा गर्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ...

नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ४६ ते ४७ अंश सेल्सिअस असे प्रचंड तापमान यंदा बेपत्ता आहे. या वर्षी आतापर्यंत मे महिन्यात नागपूरच्या तापमानाचा उच्चांक ४२.२ अंश सेल्सिअस एवढाच राहिला आहे. त्यामुळे यंदा नागपुरात मिश्कीलपणे का होईना, ‘बच्चा गर्मी’ असल्याची चर्चा आहे.

नागपूरचा उन्हाळा म्हणजे अंग भाजून काढणारा. नऊतपाच्या काळात तर सूर्य आग ओकतो की काय असाच अनुभव येतो. त्यामुळेच वैदर्भीय उन्हाळा अनेकांना नकोसा वाटतो. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा नऊतपाला सुरुवात होते आणि पुढचे नऊ दिवस पारा तीव्रतेने वाढत जातो. मात्र, यंदा २५ मेपासून नऊ तपाला सुरुवात झाली असली तरी तापमान ४२ अंशांच्या वर जाऊ शकलेले नाही. दरवर्षी नऊतपा सुरू होण्याच्या आधीपर्यंत विदर्भाच्या बहुतांशी भागात तापमान ४४ किंवा ४५ अंश सेल्सिअसच्या घरात राहते आणि नऊ तपाला सुरुवात होताच ते ४५ अंशांच्या वर पोहोचते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे आहे. दरवर्षी राज्यात सर्वांत गरम शहराची नोंद होत असलेले चंद्रपूर आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेले नाही. हवामान विभागाच्या मते मान्सून अंदमान आणि केरळच्या तटाजवळ पोहोचल्यामुळे आता तापमान खूप काही वाढू शकणार नाही.

- गेल्या वर्षी आणि या वर्षी नागपुरातील तापमानाची तुलना

तारीख २०२० २०२१

२१ मे ४४.२ अंश ३९.० अंश

२२ मे ४४.५ अंश ४०.९ अंश

२३ मे ४५.६ अंश ३९.९ अंश

२४ मे ४६.५ अंश ४१.३ अंश

२५ मे ४६.७ अंश ३९.४ अंश

२६ मे ४७.० अंश ४२.० अंश

२७ मे ४६.० अंश ४१.० अंश

- असा उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवत आहे

यंदाचा उन्हाळा असा कमकुवत का आहे, या संदर्भात हवामान विभागाला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत वेळोवेळी झालेला पाऊस आणि त्यामुळे जवळपास रोजच निर्माण होणारे दमट हवामान याला कारणीभूत आहे. असा कमकुवत उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवायला येत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

- पाऊसही होईल समाधानकारक

उन्हाळाचा चांगला तापला की पाऊसही चांगलाच होतो, असा समज आहे. परंतु चांगल्या मान्सूनसाठी अजूनही काही निकष असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. यंदा ते इतर निकष स्पष्ट जाणवत असल्याने पाऊस समाधानकारक होईलच, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.