शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा नागपुरात ‘बच्चा गर्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ...

नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ४६ ते ४७ अंश सेल्सिअस असे प्रचंड तापमान यंदा बेपत्ता आहे. या वर्षी आतापर्यंत मे महिन्यात नागपूरच्या तापमानाचा उच्चांक ४२.२ अंश सेल्सिअस एवढाच राहिला आहे. त्यामुळे यंदा नागपुरात मिश्कीलपणे का होईना, ‘बच्चा गर्मी’ असल्याची चर्चा आहे.

नागपूरचा उन्हाळा म्हणजे अंग भाजून काढणारा. नऊतपाच्या काळात तर सूर्य आग ओकतो की काय असाच अनुभव येतो. त्यामुळेच वैदर्भीय उन्हाळा अनेकांना नकोसा वाटतो. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा नऊतपाला सुरुवात होते आणि पुढचे नऊ दिवस पारा तीव्रतेने वाढत जातो. मात्र, यंदा २५ मेपासून नऊ तपाला सुरुवात झाली असली तरी तापमान ४२ अंशांच्या वर जाऊ शकलेले नाही. दरवर्षी नऊतपा सुरू होण्याच्या आधीपर्यंत विदर्भाच्या बहुतांशी भागात तापमान ४४ किंवा ४५ अंश सेल्सिअसच्या घरात राहते आणि नऊ तपाला सुरुवात होताच ते ४५ अंशांच्या वर पोहोचते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे आहे. दरवर्षी राज्यात सर्वांत गरम शहराची नोंद होत असलेले चंद्रपूर आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेले नाही. हवामान विभागाच्या मते मान्सून अंदमान आणि केरळच्या तटाजवळ पोहोचल्यामुळे आता तापमान खूप काही वाढू शकणार नाही.

- गेल्या वर्षी आणि या वर्षी नागपुरातील तापमानाची तुलना

तारीख २०२० २०२१

२१ मे ४४.२ अंश ३९.० अंश

२२ मे ४४.५ अंश ४०.९ अंश

२३ मे ४५.६ अंश ३९.९ अंश

२४ मे ४६.५ अंश ४१.३ अंश

२५ मे ४६.७ अंश ३९.४ अंश

२६ मे ४७.० अंश ४२.० अंश

२७ मे ४६.० अंश ४१.० अंश

- असा उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवत आहे

यंदाचा उन्हाळा असा कमकुवत का आहे, या संदर्भात हवामान विभागाला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत वेळोवेळी झालेला पाऊस आणि त्यामुळे जवळपास रोजच निर्माण होणारे दमट हवामान याला कारणीभूत आहे. असा कमकुवत उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवायला येत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

- पाऊसही होईल समाधानकारक

उन्हाळाचा चांगला तापला की पाऊसही चांगलाच होतो, असा समज आहे. परंतु चांगल्या मान्सूनसाठी अजूनही काही निकष असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. यंदा ते इतर निकष स्पष्ट जाणवत असल्याने पाऊस समाधानकारक होईलच, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.