शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे सुरक्षा कवच ‘मारोतराव’

By admin | Updated: October 20, 2015 03:50 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक क्रांतीला उभे करण्यासाठी अनेकांचे हात झटले. या सोहळ्याचा पाया ज्यांनी कष्टाने, निष्ठेने भक्कम केला अशा अनेक भीमसैनिकांपैकी एक आहेत मारोती हिरामण बहादुरे. धम्मदीक्षेच्या सोहळ्यात बाबासाहेबांचे कवच म्हणून ते उभे राहिले. साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी धडपडणारे असे ते सच्चे भीमसैनिक होते.नागपूर जिल्ह्यातील आष्टी गावात एका गरीब कुटुंबात मारोतीचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांना अस्पृश्यतेचा माराही सहन करावा लागला. पावसाळी दिवसात गावाचे रस्ते चिखलाने भरलेले असताना शाळेत जातेवेळी मारोतीचे पाय चिखलाने माखायचे, तेव्हा इतर स्पृश्य सवर्णांच्या मुलाप्रमाणे स्वच्छ पाणी दिले जात नसे, त्यांना रस्त्यातील एखाद्या डबक्यातील घाण पाण्याने आपले पाय धुवावे लागायचे, त्यानंतरच वर्गात प्रवेश दिला जायचा. चातुर्वर्ण्याच्या विषारी अस्पृश्यतेच्या या जखमा माथ्यावर कोरून १९३९ ला ते नागपुरात आले. मॉडेल मिलमध्ये नोकरी धरली. त्यावेळी पं. रेवाराम कवाडे, हि.ल. कोसरे, दशरथ पाटील यांचे दलितोद्धाराचे कार्य जोरात सुरू होते. मारोतीही या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पुढे लोक त्यांना मारोतराव म्हणून ओळखायला लागले. त्यांच्यातील निडरता आणि धाडस पाहून त्यांना समता सैनिक दलाच्या नागपूर शाखेचे उपाध्यक्ष करण्यात आले. १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम मारोतरावांच्या पुढाकाराने चिटणीस पार्क येथे झाला. समता सैनिक दलाचा एक निष्ठावान सेनानी म्हणून मारोतरावांकडे पाहिले जात होते. धम्मदीक्षेसाठी बाबासाहेब मुंबईहून १३ आॅक्टोबरला रात्री १२ वाजता येणार होते. याची माहिती मारोतरावांना मिळताच ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उंटखाना, जोगीनगर या वस्तीतून २००० स्त्री, पुरुषांना नागपूर विमानतळ येथे रात्री ११ वाजता घेऊन गेले होते. जेव्हा बाबासाहेब आनंद टॉकिजजवळील श्याम हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा भेटणाऱ्यांनी गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी रेवाराम कवाडे व बाबू हरिदास आवळे यांनी मारोतरावांच्या देखरेखीखाली एक समता सैनिक दलाचा गट निवडला होता. मारोतराव स्वत: तैनात होते. त्याचवेळी प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर आपल्या २० लोकांसोबत बाबासाहेबांना भेटावयास आले. मारोतरावांनी मोठ्या हिमतीने त्यांना थांबविले. बाबासाहेबांच्या परवानगीनंतरच त्यांना भेटायला जाऊ दिले. माडखोलकर आणि बाबासाहेब यांच्यात होत असलेल्या चर्चेतून वाद उत्पन्न होईल, अशावेळी त्यांनी आपली तयारीही करून ठेवली होती. धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी बाबासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी मारोतरावांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. १६ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे होणाऱ्या दीक्षा सोहळ्याच्या ठिकाणी मारोतरावांनी बाबासाहेबांच्या सुरक्षेचे कार्य केले. ते बाबासाहेबांसोबत चंद्रपूरला गेले होते. समतेच्या प्रवाहाला गती देत बाबासाहेबांची सुरक्षा हे एकच ध्येय मारोतराव यांनी जीवनभर बाळगले होते.‘विदर्भातील दलित चळवळी’चा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) मागोवा आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभागप्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. मारोती बहादुरे यांच्या बद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.