शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे सुरक्षा कवच ‘मारोतराव’

By admin | Updated: October 20, 2015 03:50 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक क्रांतीला उभे करण्यासाठी अनेकांचे हात झटले. या सोहळ्याचा पाया ज्यांनी कष्टाने, निष्ठेने भक्कम केला अशा अनेक भीमसैनिकांपैकी एक आहेत मारोती हिरामण बहादुरे. धम्मदीक्षेच्या सोहळ्यात बाबासाहेबांचे कवच म्हणून ते उभे राहिले. साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी धडपडणारे असे ते सच्चे भीमसैनिक होते.नागपूर जिल्ह्यातील आष्टी गावात एका गरीब कुटुंबात मारोतीचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांना अस्पृश्यतेचा माराही सहन करावा लागला. पावसाळी दिवसात गावाचे रस्ते चिखलाने भरलेले असताना शाळेत जातेवेळी मारोतीचे पाय चिखलाने माखायचे, तेव्हा इतर स्पृश्य सवर्णांच्या मुलाप्रमाणे स्वच्छ पाणी दिले जात नसे, त्यांना रस्त्यातील एखाद्या डबक्यातील घाण पाण्याने आपले पाय धुवावे लागायचे, त्यानंतरच वर्गात प्रवेश दिला जायचा. चातुर्वर्ण्याच्या विषारी अस्पृश्यतेच्या या जखमा माथ्यावर कोरून १९३९ ला ते नागपुरात आले. मॉडेल मिलमध्ये नोकरी धरली. त्यावेळी पं. रेवाराम कवाडे, हि.ल. कोसरे, दशरथ पाटील यांचे दलितोद्धाराचे कार्य जोरात सुरू होते. मारोतीही या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पुढे लोक त्यांना मारोतराव म्हणून ओळखायला लागले. त्यांच्यातील निडरता आणि धाडस पाहून त्यांना समता सैनिक दलाच्या नागपूर शाखेचे उपाध्यक्ष करण्यात आले. १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम मारोतरावांच्या पुढाकाराने चिटणीस पार्क येथे झाला. समता सैनिक दलाचा एक निष्ठावान सेनानी म्हणून मारोतरावांकडे पाहिले जात होते. धम्मदीक्षेसाठी बाबासाहेब मुंबईहून १३ आॅक्टोबरला रात्री १२ वाजता येणार होते. याची माहिती मारोतरावांना मिळताच ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उंटखाना, जोगीनगर या वस्तीतून २००० स्त्री, पुरुषांना नागपूर विमानतळ येथे रात्री ११ वाजता घेऊन गेले होते. जेव्हा बाबासाहेब आनंद टॉकिजजवळील श्याम हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा भेटणाऱ्यांनी गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी रेवाराम कवाडे व बाबू हरिदास आवळे यांनी मारोतरावांच्या देखरेखीखाली एक समता सैनिक दलाचा गट निवडला होता. मारोतराव स्वत: तैनात होते. त्याचवेळी प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर आपल्या २० लोकांसोबत बाबासाहेबांना भेटावयास आले. मारोतरावांनी मोठ्या हिमतीने त्यांना थांबविले. बाबासाहेबांच्या परवानगीनंतरच त्यांना भेटायला जाऊ दिले. माडखोलकर आणि बाबासाहेब यांच्यात होत असलेल्या चर्चेतून वाद उत्पन्न होईल, अशावेळी त्यांनी आपली तयारीही करून ठेवली होती. धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी बाबासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी मारोतरावांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. १६ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे होणाऱ्या दीक्षा सोहळ्याच्या ठिकाणी मारोतरावांनी बाबासाहेबांच्या सुरक्षेचे कार्य केले. ते बाबासाहेबांसोबत चंद्रपूरला गेले होते. समतेच्या प्रवाहाला गती देत बाबासाहेबांची सुरक्षा हे एकच ध्येय मारोतराव यांनी जीवनभर बाळगले होते.‘विदर्भातील दलित चळवळी’चा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) मागोवा आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभागप्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. मारोती बहादुरे यांच्या बद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.