शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

आंबेडकरी जनतेला बाबासाहेब समजलेच नाही

By admin | Updated: August 25, 2014 01:15 IST

ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली,

परिसंवाद : मनोज संसारे यांचे प्रतिपादन नागपूर : ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली, असे मी मानत नाही. रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजण्यासाठी अगोदर आंबेडकरांना समजून घेणे आवश्यक आहे. मात्र आंबेडकरी जनतेने डॉ. आंबेडकरांचा केवळ जगण्यापुरता विचार केला आहे. त्यांना कधीही समजून घेतलेले नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी परिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी केले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने ‘रिपब्लिकन तत्त्वज्ञान न स्वीकारल्यामुळे आंबेडकरी समाजाची अवनती’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. सीताबर्डी येथील हिंदी मोर भवनच्या सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील खोब्रागडे होते. मंचावर आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, परमानंद रामटेके, मेघराज काटकर, माणिकलाल बंबार्डे, जिंदा भगत व आर. आर. घोडेस्वार उपस्थित होते. संसारे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन विचार समजला असता, तर आज आमच्या घराचे शंभर तुकडे झाले नसते. समाजाने बाबासाहेबांचा केवळ जगण्यासाठी उपयोग केला आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, असे सांगितले. त्यानुसार आम्ही शिकलो. नोकऱ्या मिळविल्या. मोठे झालो. पैसा मिळविला. पण सर्वकाही केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी. त्या शिक्षणाचा समाजासाठी कोणताही उपयोग केला नाही. आंबेडकरी लोकांनीच रिपब्लिकन पक्षाला खुजे करण्याचे काम केले आहे. यातून समाजाची खरी अधोगती झाली आहे. पण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील खरा रिपब्लिकन पक्ष उभा करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)