शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी जनतेला बाबासाहेब समजलेच नाही

By admin | Updated: August 25, 2014 01:15 IST

ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली,

परिसंवाद : मनोज संसारे यांचे प्रतिपादन नागपूर : ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली, असे मी मानत नाही. रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजण्यासाठी अगोदर आंबेडकरांना समजून घेणे आवश्यक आहे. मात्र आंबेडकरी जनतेने डॉ. आंबेडकरांचा केवळ जगण्यापुरता विचार केला आहे. त्यांना कधीही समजून घेतलेले नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी परिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी केले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने ‘रिपब्लिकन तत्त्वज्ञान न स्वीकारल्यामुळे आंबेडकरी समाजाची अवनती’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. सीताबर्डी येथील हिंदी मोर भवनच्या सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील खोब्रागडे होते. मंचावर आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, परमानंद रामटेके, मेघराज काटकर, माणिकलाल बंबार्डे, जिंदा भगत व आर. आर. घोडेस्वार उपस्थित होते. संसारे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन विचार समजला असता, तर आज आमच्या घराचे शंभर तुकडे झाले नसते. समाजाने बाबासाहेबांचा केवळ जगण्यासाठी उपयोग केला आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, असे सांगितले. त्यानुसार आम्ही शिकलो. नोकऱ्या मिळविल्या. मोठे झालो. पैसा मिळविला. पण सर्वकाही केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी. त्या शिक्षणाचा समाजासाठी कोणताही उपयोग केला नाही. आंबेडकरी लोकांनीच रिपब्लिकन पक्षाला खुजे करण्याचे काम केले आहे. यातून समाजाची खरी अधोगती झाली आहे. पण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील खरा रिपब्लिकन पक्ष उभा करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)