शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवर

By admin | Updated: January 12, 2016 02:50 IST

चैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

अपहरणाचे निमित्त : बुवाबाजी करणाऱ्यांची यादी, अनेकांची चौकशी नरेश डोंगरे नागपूरचैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. भविष्यात अशी कोणती अनुचित घटना घडल्यास पोलीस चौकशीसाठी बोलवू शकतात, हे भाकीत कळल्याने या सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चैतन्यच्या अपहरणाची एकूणच पद्धत कळाल्यानंतर या अपहरणकांडात सराईत गुन्हेगार असावा, असा कयास पोलिसांनी लावला. त्यामुळे यापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यांशी संबंधित आरोपींची यादी पोलिसांनी बाहेर काढली होती. त्यांच्यातील कोण कारागृहात आहे आणि कोण कारागृहाबाहेर त्याची वर्गवारी करून पोलिसांची वेगवेगळी पथके या सर्वांची ‘आत-बाहेर‘ चौकशी करू लागले. १२२ जणांची चौैकशी बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवरनागपूर : पोलीस चौकशी करू लागले. मात्र, त्यांच्याकडून कोणताच धागादोरा पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे नंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार, प्रॉपर्टी डिलिंग करणारे आणि चैतन्यच्या वडिलांशी ज्यांचे-ज्यांचे व्यवहार झाले, त्यांची चौकशी केली. मात्र, त्यातूनही काहीच हाती लागले नाही. दरम्यान, चैतन्यचे अपहरण होऊन २०-२२ तासांचा कालावधी लोटूनही अपहरणकर्त्यांची वाट दाखवणारा मार्ग मिळत नसल्यामुळे पोलीस अस्वस्थ झाले होते. गेल्या वर्षी वर्धा येथे एका निरागस बालकाचे अपहरण आणि हत्या बुवाबाजी करणाऱ्याच्या सल्ल्याने झाल्याची बाब लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ‘गावागावात भोंदुगिरी करणाऱ्यांकडे नजर वळवली. त्यानुसार, नागपूर आणि आजूबाजूच्या गावातील बुवाबाजी करणारे, गंडेदोरे देणारे, कथित महाराज, भविष्य वर्तविणारे, छोट्या मुलांची पूजा केल्यास धन मिळते, असे आमिष दाखविणारे अशा सर्वांची यादी पोलिसांनी तयार केली. त्यानंतर त्यांना हुडकणे सुरू झाले. १२२ जणांच्या यादीतील प्रत्येकाची एकाच ठिकाणी चौकशी केल्यास खूप वेळ जाईल, याची कल्पना असल्यामुळे एकाच वेळी विविध ठिकाणी या बुवाबाजी करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. अनेक भोंदूंना, महाराजांना प्रथमच पोलिसांचा दणका कळला.भविष्यातील संकल्प भविष्यात अशी वेळ आपल्यावर येईल, अशी कुणालाच कल्पना नव्हती अन् कुणी भविष्यच काय तसे स्वप्नही बघितले नव्हते. त्यामुळे चौकशीच्या वेळी सारेच धास्तावले. या प्रकरणातच नव्हे तर पुढच्या अशा प्रकरणातही ‘पोलिसांच्या चौकशीचा’ सामना करावा लागू शकतो, याची कल्पना चैतन्यच्या अपहरणकांडाच्या निमित्ताने आल्यामुळे अनेकांनी भविष्यात भविष्य बघणार नाही अन् कुणाला काही सांगणारही नाही, असा पोलिसांसमोर संकल्प केला आहे.