शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवर

By admin | Updated: January 12, 2016 02:50 IST

चैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

अपहरणाचे निमित्त : बुवाबाजी करणाऱ्यांची यादी, अनेकांची चौकशी नरेश डोंगरे नागपूरचैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. भविष्यात अशी कोणती अनुचित घटना घडल्यास पोलीस चौकशीसाठी बोलवू शकतात, हे भाकीत कळल्याने या सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चैतन्यच्या अपहरणाची एकूणच पद्धत कळाल्यानंतर या अपहरणकांडात सराईत गुन्हेगार असावा, असा कयास पोलिसांनी लावला. त्यामुळे यापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यांशी संबंधित आरोपींची यादी पोलिसांनी बाहेर काढली होती. त्यांच्यातील कोण कारागृहात आहे आणि कोण कारागृहाबाहेर त्याची वर्गवारी करून पोलिसांची वेगवेगळी पथके या सर्वांची ‘आत-बाहेर‘ चौकशी करू लागले. १२२ जणांची चौैकशी बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवरनागपूर : पोलीस चौकशी करू लागले. मात्र, त्यांच्याकडून कोणताच धागादोरा पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे नंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार, प्रॉपर्टी डिलिंग करणारे आणि चैतन्यच्या वडिलांशी ज्यांचे-ज्यांचे व्यवहार झाले, त्यांची चौकशी केली. मात्र, त्यातूनही काहीच हाती लागले नाही. दरम्यान, चैतन्यचे अपहरण होऊन २०-२२ तासांचा कालावधी लोटूनही अपहरणकर्त्यांची वाट दाखवणारा मार्ग मिळत नसल्यामुळे पोलीस अस्वस्थ झाले होते. गेल्या वर्षी वर्धा येथे एका निरागस बालकाचे अपहरण आणि हत्या बुवाबाजी करणाऱ्याच्या सल्ल्याने झाल्याची बाब लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ‘गावागावात भोंदुगिरी करणाऱ्यांकडे नजर वळवली. त्यानुसार, नागपूर आणि आजूबाजूच्या गावातील बुवाबाजी करणारे, गंडेदोरे देणारे, कथित महाराज, भविष्य वर्तविणारे, छोट्या मुलांची पूजा केल्यास धन मिळते, असे आमिष दाखविणारे अशा सर्वांची यादी पोलिसांनी तयार केली. त्यानंतर त्यांना हुडकणे सुरू झाले. १२२ जणांच्या यादीतील प्रत्येकाची एकाच ठिकाणी चौकशी केल्यास खूप वेळ जाईल, याची कल्पना असल्यामुळे एकाच वेळी विविध ठिकाणी या बुवाबाजी करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. अनेक भोंदूंना, महाराजांना प्रथमच पोलिसांचा दणका कळला.भविष्यातील संकल्प भविष्यात अशी वेळ आपल्यावर येईल, अशी कुणालाच कल्पना नव्हती अन् कुणी भविष्यच काय तसे स्वप्नही बघितले नव्हते. त्यामुळे चौकशीच्या वेळी सारेच धास्तावले. या प्रकरणातच नव्हे तर पुढच्या अशा प्रकरणातही ‘पोलिसांच्या चौकशीचा’ सामना करावा लागू शकतो, याची कल्पना चैतन्यच्या अपहरणकांडाच्या निमित्ताने आल्यामुळे अनेकांनी भविष्यात भविष्य बघणार नाही अन् कुणाला काही सांगणारही नाही, असा पोलिसांसमोर संकल्प केला आहे.