शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीने गहिवरलेल्या ‘बाबां’नी कोरली स्मरणशिला

By admin | Updated: February 4, 2015 00:53 IST

इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात.

३६ वर्षे पूर्ण : आनंदवनमध्ये ‘त्या’ स्मृतींना उजाळासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरइमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. मात्र कळत-नकळत आनंदवनच्या स्थापनेसाठीही अनेक वृक्षांची आहुती द्यावी लागली होती. तेव्हा बाबा खूप व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली. मात्र आहुती दिलेल्या वृक्षांचे कायम स्मरण राहावे, यासाठी त्यांनी आनंदवनात अनामवृक्षांची स्मरणशिला कोरली. या कोनशिलेला ३६ वर्षे पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबांचे निसर्गावरही तेवढेच प्रेम होते, हेच या स्मरणशिलेवरून अंकित होते. आनंदवनमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या हजारो कृष्ठरुग्णांना आधार मिळाला. एकीकडे त्यांना आधार मिळाला असला, तरी त्यासाठी अनेक वृक्षांची तोड करावी लागली. वृक्षतोडीमुळे बाबांचे मन हेलावले. त्यामुळे बाबांनी आनंदवनात ४ फेब्रुवारी १९७९ रोजी ‘अमनवृक्षाची स्मरणशिला’ स्थापन केली. त्या वृक्षांचे स्मरण आजही आनंदवनमध्ये होत आहे.आदर्श घेतील काय?आनंदवन उभारताना शेकडो वृक्षांचा बळी गेला. त्यानंतर त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. आज रस्ता चौपदरीकरणासाठी हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. वृक्ष हटविताना त्या वृक्षाच्या मोबदल्यात १० वृक्ष लावण्याची हमी द्यावी लागते, त्यानंतरच ते वृक्ष संबंधित ठिकाणाहून हटविण्यास परवानगी दिली जाते. परंतु, १० वृक्ष तर सोडा एक वृक्षही जगविण्यासाठी कुणी धडपडत नाही. कुणालाही त्याचे सोयरसुतक वाटत नाही. बाबांच्या या कार्याचा आदर्र्श साऱ्यांनीच घ्यायला हवा.