शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठीचा पेपर आउट ऑफ सिलॅबस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

- विद्यार्थ्यांचा आरोप : कोरोना संक्रमणाने उडविला ऑनलाईन एज्युकेशनचा फज्जा - ‘एमसीक्यू’ पेपर काढताना गुणोत्तर साधण्यात सेटर-मॉडरेटर यांना अपयश ...

- विद्यार्थ्यांचा आरोप : कोरोना संक्रमणाने उडविला ऑनलाईन एज्युकेशनचा फज्जा

- ‘एमसीक्यू’ पेपर काढताना गुणोत्तर साधण्यात सेटर-मॉडरेटर यांना अपयश

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठी साहित्य विषयाचा पेपर शुक्रवारी (दि. ९) पार पडला. ४० प्रश्न असलेल्या या पेपरमध्ये अर्धेअधिक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे उतरल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. विशेष म्हणजे, वर्णनात्मक प्रश्नोत्तरांची सवय असलेल्या विद्यार्थ्यांना पर्यायवाचक प्रश्न उतरल्याने, ते सोडविताना गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे. नेमका असाच गोंधळ पेपर काढताना पेपरसेटर व मॉडरेटर यांचाही उडालेला दिसून येतो. त्याच कारणाने, प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आउट ऑफ सिलॅबस की शिकविण्यात न आलेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठी साहित्याचा पेपर हा वर्णनात्मक शैलीचा असतो. ८० गुण असलेल्या या पेपरमध्ये दोन प्रश्न प्रदीर्घ स्वरूपाचे, प्रत्येक १६ मार्काचे असतात. उर्वरित तीन प्रश्न लघुत्तरी स्वरूपात चार लहान-लहान उपप्रश्नांत प्रत्येकी चार गुणांचे असतात. यात नियमानुसार अभ्यासक्रमातील संत तुकारामांच्या अभंगांवर ५६ गुण, तर काव्यरसशास्त्रावर २४ गुण असतात. यंदा कोरोना संक्रमणाच्या काळामुळे हा पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. त्यामुळे, वर्णनात्मक शैलीऐवजी पर्यायवाचक किंवा बहुपर्यायी अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन (एमसीक्यू) स्वरूपात हा पेपर अभ्यासमंडळाच्या पेपरसेटर व मॉडरेटरनी तयार केला. ४० प्रश्न प्रत्येकी २ गुणांचे अशा एकूण ८० गुणांचा हा पेपर काढला गेला. यात २८ प्रश्न संत तुकारामांवर, तर १२ प्रश्न काव्यशास्त्रावर असावेत, असा नियम होता. शिवाय, अभ्यासक्रमातील नियोजित चार घटकांवर प्रत्येकी १० प्रश्न येणे बंधनकारक होते. मात्र, यातील गुणोत्तर साधण्यात पेपरसेटर व मॉडरेटर यांचा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय, वर्षभरापासून सुरू असलेल्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये बरेच घटक शिकवण्यात आलेले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच, पेपर सोडविताना आलेले अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना अनोळखी वाटल्याने मुलांना प्रश्नांची उत्तरे साेडविता आलेली नाहीत. त्यामुळेच, मुलांनी आऊट ऑफ सिलॅबस पेपर उतरल्याचा आरोप केला आहे.

------------------

तुकारामांचे अभंग, तुकारामांच्या निवड अभंगांचा अभ्यास व समीक्षण अशा तीन युनिटचा समावेश यंदा अभ्यासक्रमात होता. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. नेटवर्क समस्या, साधे मोबाईल आदी समस्यांमुळे अनेक विद्यार्थी बरेचदा कनेक्ट होऊ शकले नसावेत. शिवाय, काही शिक्षकांनी अपेक्षित विषयावरच भर दिला असावा. त्यामुळे, मुलांना पेपर सोडविताना अनेक प्रश्न अनोळखी वाटले असावे. मात्र, पेपर आऊट ऑफ सिलॅबस नव्हता. सगळे प्रश्न अभ्यासक्रमातूनच आलेले आहेत.

- डॉ. मनीषा नागपुरे, मराठी विषयाचे प्राध्यापक : पीडब्ल्यूएस कॉलेज, नागपूर

-----------------

अभ्यासमंडळाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमावर पेपर निघायला हवा. पेपर सेट केल्यावर मॉडरेटर ते तपासतात. मात्र, त्यात चुका असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. याबाबत काही मुलांच्या तक्रारीही आल्या आहेत. अभ्यास मंडळ याकडे लक्ष पुरवेल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. राजेंद्र वाटाणे, मराठी विषाचे प्राध्यापक : तायवाडे कॉलेज, कोराडी

----------------

अभ्यासक्रमात तुकारामाच्या अभंगांवर १० ते १२ प्रश्नच उतरले. मात्र, जे अभ्यासक्रमात नव्हते अशा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्यावर प्रश्न उतरले. वि.स. खांडेकरांबाबत अभ्यासक्रमात नसलेला प्रश्नही होता. तसेच मोमेटाचे काव्यप्रकार किती या प्रश्नाला योग्य उत्तराचा पर्याय दिलाच नव्हता. त्यामुळे, सगळ्याच प्रश्नांवर अंदाजे टोले मारण्यावरच भर दिला. याबाबत आमच्या शिक्षकांकडे तक्रार केली आहे.

- रसिका भगत व प्रशांत पिल्लेवान, विद्यार्थी : बी.ए. द्वितिय (मराठी साहित्य)

---------------