शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

इतिहासातून स्वाभिमान जागृत व्हावा

By admin | Updated: July 7, 2015 02:27 IST

आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला.

सरसंघचालक मोहन भागवत : संत गुलाबराव महाराजांच्या जीवन शताब्दी महोत्सवास प्रारंभ नागपूर : आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला. इतिहासातून श्रेष्ठ व्यक्तींच्या मौलिक विचारांचे संस्कार मिळतात. त्यामुळे हे विचार सर्वदूर गेले पाहिजे व इतिहासातून नागरिकांचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दिव्यचक्षु श्रीगुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व ‘सक्षम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सक्षम’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबेकर, संत गुुलाबराब महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. भय्यासाहेब घटाटे, संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मधुसूदन पेन्ना, ‘सक्षम’चे नागपूर अध्यक्ष सुधाकर इंगोले व सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे ब्रेल ग्रंथ, वैचारिक ग्रंथ व श्रवण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच डॉ. पेन्ना लिखित प्रज्ञाचाक्षुषम् या संस्कृत महाकाव्याचेदेखील लोकार्पण करण्यात आले.कर्मयोग व भक्तियोगातूनच ज्ञानयोग प्राप्त होतो. संत गुलाबराव महाराजांच्या विचारांमध्ये भक्तीची शक्ती होती. नागरिकांच्या स्वाभिमानाला नवसंजीवनी देण्याची या विचारांमध्ये क्षमता आहे. त्यामुळे त्यांचा प्रसार केलाच पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. संत गुलाबराव महाराजांनी भारतीय संस्कृतीच्या महनीयतेचे विश्वमय दर्शन साहित्यातून घडविले. त्यांचे विचार जगापर्यंत पोहोचले नाही हे जगाचे दुर्दैव आहे, असे मत डॉ. कसबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी पं. धाकडे यांनी व्हायोलिनवर लघुबंदिशीद्वारे महाराजांना अभिवादन केले. श्रीनिधी घटाटे व अंध कलाकारांद्वारे संत गुलाबराव महाराज रचित ‘आंधळी गौळण’मधील काही गीतांचे सादरीकरण करण्यात आले. अंध कलाकारांनी सादर केलेल्या रचनांनी तर उपस्थितांची मने जिंकली. सुधाकर इंगोले यांनी प्रास्ताविक केले तर रेणुका देशकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)सरसंघचालकांची विरोधकांवर टीकाब्रिटिशांच्या शिक्षणव्यवस्थेमुळे अनेक नागरिकांमध्ये मानसिक गुलामगिरी निर्माण झाली. प्रज्ञा हरविल्यामुळे अनेकांचा स्वत:च्या विचारांवरील विश्वास हरविला व बाहेरील गोष्टी त्यांना चांगल्या वाटू लागल्या. त्यामुळेच भारतीय धर्मसंस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला किंवा महापुरुषांबाबत चांगली विधाने केली तर लगेच सांप्रदायिकतेचे नाव घेऊन ओरड करण्यात येते. यात राजकीय स्वार्थ तर असतोच, परंतु प्रज्ञा नसलेल्या अनेकांचादेखील यात समावेश असतो, असे प्रतिपादन करीत सरसंघचालकांनी विरोधकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.