शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासातून स्वाभिमान जागृत व्हावा

By admin | Updated: July 7, 2015 02:27 IST

आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला.

सरसंघचालक मोहन भागवत : संत गुलाबराव महाराजांच्या जीवन शताब्दी महोत्सवास प्रारंभ नागपूर : आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला. इतिहासातून श्रेष्ठ व्यक्तींच्या मौलिक विचारांचे संस्कार मिळतात. त्यामुळे हे विचार सर्वदूर गेले पाहिजे व इतिहासातून नागरिकांचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दिव्यचक्षु श्रीगुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व ‘सक्षम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सक्षम’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबेकर, संत गुुलाबराब महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. भय्यासाहेब घटाटे, संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मधुसूदन पेन्ना, ‘सक्षम’चे नागपूर अध्यक्ष सुधाकर इंगोले व सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे ब्रेल ग्रंथ, वैचारिक ग्रंथ व श्रवण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच डॉ. पेन्ना लिखित प्रज्ञाचाक्षुषम् या संस्कृत महाकाव्याचेदेखील लोकार्पण करण्यात आले.कर्मयोग व भक्तियोगातूनच ज्ञानयोग प्राप्त होतो. संत गुलाबराव महाराजांच्या विचारांमध्ये भक्तीची शक्ती होती. नागरिकांच्या स्वाभिमानाला नवसंजीवनी देण्याची या विचारांमध्ये क्षमता आहे. त्यामुळे त्यांचा प्रसार केलाच पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. संत गुलाबराव महाराजांनी भारतीय संस्कृतीच्या महनीयतेचे विश्वमय दर्शन साहित्यातून घडविले. त्यांचे विचार जगापर्यंत पोहोचले नाही हे जगाचे दुर्दैव आहे, असे मत डॉ. कसबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी पं. धाकडे यांनी व्हायोलिनवर लघुबंदिशीद्वारे महाराजांना अभिवादन केले. श्रीनिधी घटाटे व अंध कलाकारांद्वारे संत गुलाबराव महाराज रचित ‘आंधळी गौळण’मधील काही गीतांचे सादरीकरण करण्यात आले. अंध कलाकारांनी सादर केलेल्या रचनांनी तर उपस्थितांची मने जिंकली. सुधाकर इंगोले यांनी प्रास्ताविक केले तर रेणुका देशकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)सरसंघचालकांची विरोधकांवर टीकाब्रिटिशांच्या शिक्षणव्यवस्थेमुळे अनेक नागरिकांमध्ये मानसिक गुलामगिरी निर्माण झाली. प्रज्ञा हरविल्यामुळे अनेकांचा स्वत:च्या विचारांवरील विश्वास हरविला व बाहेरील गोष्टी त्यांना चांगल्या वाटू लागल्या. त्यामुळेच भारतीय धर्मसंस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला किंवा महापुरुषांबाबत चांगली विधाने केली तर लगेच सांप्रदायिकतेचे नाव घेऊन ओरड करण्यात येते. यात राजकीय स्वार्थ तर असतोच, परंतु प्रज्ञा नसलेल्या अनेकांचादेखील यात समावेश असतो, असे प्रतिपादन करीत सरसंघचालकांनी विरोधकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.