शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

३६२ ग्रामपंचायतींमध्ये कोविडविषयी जनजागृतीचा जागर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी माहिती व प्रबोधनाचा जागर ग्रामपंचायतीत सुरू आहे. २७ मेपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी माहिती व प्रबोधनाचा जागर ग्रामपंचायतीत सुरू आहे. २७ मेपासून सुरू झालेल्या या माहिती प्रसारणाच्या मोहिमेत आतापर्यंत ३६२ ग्रामपंचायतींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागराचे काम केले असून, जिल्ह्यातील ७७८ ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीपाचा हंगाम सुरू होणार असून मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पेरणी होण्यापूर्वी जनजागृतीची मोहीम पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा भर आहे. १३ तालुक्यात २६ अधिकाऱ्यांच्या चमू सातत्याने आशा, अंगणवाडी सेविका, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे, समस्यांचे निराकरण करीत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ३५, दुसऱ्या दिवशी ७८, तिसऱ्या दिवशी ५४, चौथ्या दिवशी ४, पाचव्या दिवशी ९५ तर १ जून रोजी ९६ ग्रामपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांनी दौरे करून माहिती दिली.

लसीकरणाविषयीच्या गैरसमजाला दूर करण्यासाठीही यात माहिती देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन एकीकडे ग्रामीण भागात जनजागृती अभियानासोबत नेमक्या व प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी अधिकाऱ्यांचेदेखील प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे ७ ते १८ जून या कालावधीत विशेष प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका विशेषतः लहान मुलांची अतिजोखीम लक्षात घेता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या प्रशिक्षणाची आखणी करण्याचे निर्देश दिले आहे.