शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

भिवापूर : जनमाणसात पसरलेल्या गैरसमजामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षीत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा गावांना भेट ...

भिवापूर : जनमाणसात पसरलेल्या गैरसमजामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षीत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा गावांना भेट देत थेट ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून, ‘टोचाल तरच वाचाल’ असे विश्वासपूर्ण मार्गदर्शन केल्या जात आहे.

सध्या ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना लस दिल्या जात आहे. मात्र तालुक्यातील काही गावखेड्यात लसीबाबत गैरसमज असल्याने या वयोगटातील नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दुसरीकडे १८ वर्षांवरील वयोगटातून लसीकरणास मोठी मागणी आहे. मात्र पुरवठा कमी असल्याने यंत्रणेने अद्यापही तरुणांना लसीकरणाची संधी दिलेली नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांनी तत्काळ लस घ्यावी यासाठी प्रशासनाने जनजागृती सुरू केली आहे. प्रभारी तहसीलदार दिनेश पवार, सहायक गट विकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक कर्तव्यस्थळावर लसीकरणाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत आहे. जनजागृती करणाऱ्या पथकाने गत दोन दिवसांत सालेभट्टी (दंदे), महालगाव, चिखलापार, मालेवाडा, शिवापूर, मानोरा, सोमनाळा, जवळी, नांद आदी गावांना भेट देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यामुळे लसीकरणास मिळणारा प्रतिसाद आता वाढत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात लस घेतलेल्या नागरिकांची संख्या २० हजारांवर पोहोचली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १७ हजारांच्या जवळपास आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्या संख्या केवळ तीन हजारापर्यंत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस दुसरा डोससाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

===Photopath===

140521\img-20210513-wa0188.jpg

===Caption===

ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना प्रभारी तहसीलदार दिनेश पवार व सहायक गट विकास अधिकारी रोशनकुमार दुबे