शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

महागाई रोखा कर सवलती द्या

By admin | Updated: June 30, 2014 00:47 IST

केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल,

नागपूर : केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येत्या १० जुलैला २०१४-१५ साठीचा आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. महागाई रोखण्यात यश येईल आणि दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून आहे. लोकसभा निवडणुकांमुळे संपुआ सरकारने यंदा फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. सत्तेवर येताच नरेंद्र मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात सरसकट १४ टक्के आणि मालभाड्यात ६ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना पहिला झटका दिला. निदान अर्थसंकल्पात तरी काही सवलती आणि दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.खिसा रिकामा करू नयेअच्छे दिन आनेवाले है, महागाई कमी करू असे सांगत सत्ता मिळवणाऱ्या भाजपने पहिल्याच महिन्यात महागाई अधिक भडकवणारा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे अर्थतज्ज्ञांसह, उद्योग जगत सर्वसामन्यांचे लक्ष आहे. कठोर निर्णयाच्या नावाखाली निदान आता तरी, मोदी सरकारने खिसा रिकामा करू नये, अशीच सर्वसामान्यांची या अर्थसंकल्पापासून अपेक्षा असेल.कर कायद्यात बदल व्हावेकर कायद्यात बदल होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. नवीन प्रत्यक्ष कर कायद्याची माहिती नागरिकांना करून द्यावी. टीडीएसवर असलेली दंडाची तरतूद रद्द व्हावी. करदाता कर भरण्यास इच्छुक आहे. किचकट कर प्रणालीतून त्याला सुटका हवी. कायदा सरळसोपा झाल्यास आजचा युवा उत्साहाने कर भरेल. बँकिंग प्रणाली सक्षम केल्यास बहुतांश व्यवहार बँकिंगच्या माध्यमातून होतील, त्यामुळे काळ्या पैशाला वाव राहणार नाही. त्याममुळे अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी हातभार लागेल. सध्या अप्रत्यक्ष कराची वसुली वाढली आहे. कराद्वारे उत्पन्न वाढीसाठी सेवा कराची आकारणी समान आणि कमी करावी, अशी सामान्यांची मागणी आहे. कर मर्यादा वाढवावी आणि सेक्शन ८० सी अंतर्गत बचतीची मर्यादा एक वरून दोन लाखांवर न्यावी. करदात्याचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी कर कायद्यात सुधारणा करा.औद्योगिक विकास हवारोजगाराची द्वारे खुली करण्यासाठी औद्योगिक विकास हवा. त्यासाठी विशेष आणि प्रोत्साहनपर योजनांची घोषणा हवी. औद्योगिक उत्पादन वाढीच्या प्रक्रियेला कशी चालना देता येईल, या दृष्टीने पाहणे निकडीचे आहे. लघू व मध्यम उद्योगांसाठी योजना हव्यात.सर्वांगीण विकास हवासामान्यांना वित्तीय तुटाची आकडेमोड समजत नाही. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टी प्रामुख्याने हव्या आहेत. त्यासाठी विशेष योजनांचा आराखडा अर्थसंकल्पात सादर करावा.