शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ, महालसह बाजारपेठेतील गर्दी टाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. सोमवारपासून नागपूर खऱ्या अर्थाने अनलॉक होत आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा उघडणार असून गर्दीही होईल. परंतु ही गर्दीच खऱ्या अर्थाने धाेकायदायक ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनो सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदींसारखी बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्व बाजारपेठा खुल्या होत असताना आपण स्वैराचाराने वागलो, खबरदारी व जवाबदारीने वागलो नाही तर हीच गर्दीची ठिकाणे उद्या कोरोना वाढविणारे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपुरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बरीचशी आटोक्यात आली आहे. नागपूर अजूनही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तरीही जिल्हा व मनपा प्रशासन संयमाने परिस्थिती हाताळत आहे. कुठलीही घाई न करता हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंधांमध्ये आणखी सवलत देत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असणारी सर्व दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टाॅरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होईल. परंतु आताच खऱ्या अर्थाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच नागपुरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदी बाजारपेठेतील ठिकाणेच खऱ्या अर्थाने हॉटस्पॉट ठरली होती, हे विसरून चालणार नाही. तेव्हा नागरिकांनो खबरदारी घ्या. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे सध्यातरी टाळा.

२८ जूनला पुन्हा आढावा

प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु याबाबतचे आदेश केवळ एका आठवड्यापुरतेच देण्यात आले आहेत. २८ जूनला पुन्हा आढावा घेतला जाईल. तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्बंध आणखी शिथिल करायचे की कडक करायचे, याचा प्रशासन निर्णय घेईल. त्यामुळे ही शिथिलता कायमस्वरूपी राहावी, असे वाटत असेल तर सर्वांनीच अधिक खबरदारी घेत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.