शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

सीताबर्डी, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ, महालसह बाजारपेठेतील गर्दी टाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. सोमवारपासून नागपूर खऱ्या अर्थाने अनलॉक होत आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा उघडणार असून गर्दीही होईल. परंतु ही गर्दीच खऱ्या अर्थाने धाेकायदायक ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनो सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदींसारखी बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्व बाजारपेठा खुल्या होत असताना आपण स्वैराचाराने वागलो, खबरदारी व जवाबदारीने वागलो नाही तर हीच गर्दीची ठिकाणे उद्या कोरोना वाढविणारे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपुरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बरीचशी आटोक्यात आली आहे. नागपूर अजूनही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तरीही जिल्हा व मनपा प्रशासन संयमाने परिस्थिती हाताळत आहे. कुठलीही घाई न करता हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंधांमध्ये आणखी सवलत देत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असणारी सर्व दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टाॅरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होईल. परंतु आताच खऱ्या अर्थाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच नागपुरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदी बाजारपेठेतील ठिकाणेच खऱ्या अर्थाने हॉटस्पॉट ठरली होती, हे विसरून चालणार नाही. तेव्हा नागरिकांनो खबरदारी घ्या. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे सध्यातरी टाळा.

२८ जूनला पुन्हा आढावा

प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु याबाबतचे आदेश केवळ एका आठवड्यापुरतेच देण्यात आले आहेत. २८ जूनला पुन्हा आढावा घेतला जाईल. तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्बंध आणखी शिथिल करायचे की कडक करायचे, याचा प्रशासन निर्णय घेईल. त्यामुळे ही शिथिलता कायमस्वरूपी राहावी, असे वाटत असेल तर सर्वांनीच अधिक खबरदारी घेत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.