शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

लेखकांनी छोट्या ग्रंथांची निर्मिती करावी

By admin | Updated: January 30, 2016 03:17 IST

अत्यंत वेगवान झालेल्या जगामध्ये खूप मोठे ग्रंथ वाचनाची सवय कमी होत आहे. यापुढे लेखकांनी सामान्य व हृदयाला भिडणाऱ्या शब्दांच्या भाषेत लेखन करण्याची गरज आहे.

नागपूर : अत्यंत वेगवान झालेल्या जगामध्ये खूप मोठे ग्रंथ वाचनाची सवय कमी होत आहे. यापुढे लेखकांनी सामान्य व हृदयाला भिडणाऱ्या शब्दांच्या भाषेत लेखन करण्याची गरज आहे. हल्ली विमान किंवा मेट्रोचा प्रवास हा एक-दोन तासातच संपतो. अशावेळी वाचकाला छोट्या ग्रंथाची आवश्यकता भासते आणि ती आपण त्याला देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी येथे केले.संविधान चौकस्थित वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुकवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, डॉ. इंद्रजित ओरके, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास टेभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, कविता महाजन, अश्विनी दिवाण, रत्नाकर नलावडे, सुनील पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथातील प्रत्येक शब्द व शब्दातील प्रत्येक भाव वाचकाला खिळवून ठेवण्यास सक्षम असला पाहिजे. असे प्रभावी साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. लेखकांच्या कल्पनाही स्पष्ट असाव्यात. समाजाला त्या लेखकाला काय संदेश द्यायचा आहे याची स्पष्ट जाणीवही त्यांना असावी. तरच ग्रंथ चळवळ वाढीस लागेल यात तिळमात्र शंका नाही, असेही डॉ. माने म्हणाले. वाचन संस्कृतीमध्ये महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगाल अग्रेसर आहे. तेथे पुस्तकांची निर्मिती, विक्री मोठ्या प्रमाणात असते. तेथील ग्रंथोत्सवाचे स्वरूप व्यापक असते. तेव्हा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात नवोदित लेखक आणि कवींना व्यासपीठ मिळायला हवे. यामुळे ग्रंथोत्सवाच्या स्वरूपात व्यापकता येईल, असे विचार देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले. समारोप समारंभापूर्वी नागपूर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘मराठी ग्रंथातील मानवी जीवन’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी पी. डब्ल्यू. एस. कॉलेज मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. इंद्रजित ओरके होते तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठ मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे आणि मॉरिस कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. जनार्दन काटकर होते.(प्रतिनिधी)