शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लेखकांनी छोट्या ग्रंथांची निर्मिती करावी

By admin | Updated: January 30, 2016 03:17 IST

अत्यंत वेगवान झालेल्या जगामध्ये खूप मोठे ग्रंथ वाचनाची सवय कमी होत आहे. यापुढे लेखकांनी सामान्य व हृदयाला भिडणाऱ्या शब्दांच्या भाषेत लेखन करण्याची गरज आहे.

नागपूर : अत्यंत वेगवान झालेल्या जगामध्ये खूप मोठे ग्रंथ वाचनाची सवय कमी होत आहे. यापुढे लेखकांनी सामान्य व हृदयाला भिडणाऱ्या शब्दांच्या भाषेत लेखन करण्याची गरज आहे. हल्ली विमान किंवा मेट्रोचा प्रवास हा एक-दोन तासातच संपतो. अशावेळी वाचकाला छोट्या ग्रंथाची आवश्यकता भासते आणि ती आपण त्याला देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी येथे केले.संविधान चौकस्थित वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुकवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, डॉ. इंद्रजित ओरके, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास टेभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, कविता महाजन, अश्विनी दिवाण, रत्नाकर नलावडे, सुनील पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथातील प्रत्येक शब्द व शब्दातील प्रत्येक भाव वाचकाला खिळवून ठेवण्यास सक्षम असला पाहिजे. असे प्रभावी साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. लेखकांच्या कल्पनाही स्पष्ट असाव्यात. समाजाला त्या लेखकाला काय संदेश द्यायचा आहे याची स्पष्ट जाणीवही त्यांना असावी. तरच ग्रंथ चळवळ वाढीस लागेल यात तिळमात्र शंका नाही, असेही डॉ. माने म्हणाले. वाचन संस्कृतीमध्ये महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगाल अग्रेसर आहे. तेथे पुस्तकांची निर्मिती, विक्री मोठ्या प्रमाणात असते. तेथील ग्रंथोत्सवाचे स्वरूप व्यापक असते. तेव्हा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात नवोदित लेखक आणि कवींना व्यासपीठ मिळायला हवे. यामुळे ग्रंथोत्सवाच्या स्वरूपात व्यापकता येईल, असे विचार देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले. समारोप समारंभापूर्वी नागपूर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘मराठी ग्रंथातील मानवी जीवन’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी पी. डब्ल्यू. एस. कॉलेज मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. इंद्रजित ओरके होते तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठ मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे आणि मॉरिस कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. जनार्दन काटकर होते.(प्रतिनिधी)