शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिकता हरवली

By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST

आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.

ताराचंद्र खांडेकर : मार्गदाता मासिकाचे चर्चासत्रनागपूर : आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले. ‘मार्गदाता’ मासिकातर्फे आज, शनिवारी हिंदी मोरभवनातील सभागृहात ‘आता आंबेडकरवाद्यांची यापुढची दिशा’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये आंबेडकरी विचारवंत डॉ. विमल कीर्ती यांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते. ‘मार्गदाता’चे संपादक दिलेश मेश्राम उपस्थित होते. खांडेकर यांनी रा.सू. गवई, कांशीराम, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती आदी आंबेडकरी नेत्यांचा नावासह उल्लेख करून त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित केली. हे नेते आंबेडकर मानत असले तरी जगत नाहीत. आजच्या नेत्यांकडून आंबेडकरांच्या नावावर केवळ स्वत:चे घर भरले जात आहे. विविध गटांत विभागलेले आंबेडकरी नेते अपप्रवृत्ती असून ती कालसापेक्ष निर्माण होतच असते. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान मान्य असणाऱ्यांनी नेतृत्वाच्या पैदासीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सामाजिक शक्ती निर्माण करणे आपले उत्तरदायित्व आहे. आजच्या पिढीपुढे अनेक नेते उभे आहेत. परंतु, त्यांची प्रामाणिकता संशयास्पद आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी निष्ठेने कार्य करून चळवळ मोठी केली. आजचे नेते दिशाभूल करतात. यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिशा गवसली नाही, असे खांडेकर यांनी सांगितले.विमल कीर्ती म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा राजकारणात असलेला दबदबा परत आणण्यासाठी विभागलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाकरिता राजकीय क्षेत्र काबीज करणे आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या शक्तीशाली झाल्याशिवाय आंबेडकरी जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. आंबेडकरी चळवळीला खऱ्या नेतृत्वाची गरज आहे. व्यक्तिवादी नेतृत्वामुळे चळवळीचा घात झाला आहे. अनिल वासनिक, निरंजन वासनिक, के. जी. इंगळे, गुणवंत पाटील, विनायक ढोके, मधुकर बोरीकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)