शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिकता हरवली

By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST

आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.

ताराचंद्र खांडेकर : मार्गदाता मासिकाचे चर्चासत्रनागपूर : आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले. ‘मार्गदाता’ मासिकातर्फे आज, शनिवारी हिंदी मोरभवनातील सभागृहात ‘आता आंबेडकरवाद्यांची यापुढची दिशा’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये आंबेडकरी विचारवंत डॉ. विमल कीर्ती यांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते. ‘मार्गदाता’चे संपादक दिलेश मेश्राम उपस्थित होते. खांडेकर यांनी रा.सू. गवई, कांशीराम, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती आदी आंबेडकरी नेत्यांचा नावासह उल्लेख करून त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित केली. हे नेते आंबेडकर मानत असले तरी जगत नाहीत. आजच्या नेत्यांकडून आंबेडकरांच्या नावावर केवळ स्वत:चे घर भरले जात आहे. विविध गटांत विभागलेले आंबेडकरी नेते अपप्रवृत्ती असून ती कालसापेक्ष निर्माण होतच असते. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान मान्य असणाऱ्यांनी नेतृत्वाच्या पैदासीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सामाजिक शक्ती निर्माण करणे आपले उत्तरदायित्व आहे. आजच्या पिढीपुढे अनेक नेते उभे आहेत. परंतु, त्यांची प्रामाणिकता संशयास्पद आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी निष्ठेने कार्य करून चळवळ मोठी केली. आजचे नेते दिशाभूल करतात. यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिशा गवसली नाही, असे खांडेकर यांनी सांगितले.विमल कीर्ती म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा राजकारणात असलेला दबदबा परत आणण्यासाठी विभागलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाकरिता राजकीय क्षेत्र काबीज करणे आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या शक्तीशाली झाल्याशिवाय आंबेडकरी जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. आंबेडकरी चळवळीला खऱ्या नेतृत्वाची गरज आहे. व्यक्तिवादी नेतृत्वामुळे चळवळीचा घात झाला आहे. अनिल वासनिक, निरंजन वासनिक, के. जी. इंगळे, गुणवंत पाटील, विनायक ढोके, मधुकर बोरीकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)