शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीची पाहणी सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पाारशिवनी व मौदा या ताालुक्यातील साोनेगााव राजा, निलज व सिंगारदीप या गावांना भेट दिली. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, वीज व अन्य नुकसानीची पाहणी केली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चाही केली. दरम्यान, ऑगस्टमध्ये आलेल्या पुराची पाहणी आता डिसेंबरमध्ये होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला.

केंद्रातून आलेल्या पथकाची दोन गटात विभागणी झाली असून यातील एका पथकाने नागपूर जिल्ह्याची गुरुवारी पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही पााहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प. चे सीईओ योगेश कुंभेजकर प्रामुख्याने उपस्थित होते. या पथकाने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरील गावाची पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झाालेली प्राथमिक मदत, सर्वेक्षण, पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती जाणून घेतली. याचवेळी पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी केली. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए.एस. महाजन यांच्यासह मंडळ अधिकारी राजेश घुडे, तलाठी विश्वजित पुरामकर पाहणी पथकात होते. २०१८ मध्ये पूर्ण झाले होते......... मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट राेजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. दुसरे एक पथक गडचिरोलीची पाहणी करीत आहे.

बॉक्स

शुक्रवारी चंद्रपूर, भंडाऱ्याची पाहणी

केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. यानंतर शनिवारी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक होईल.

बॉक्स

जिल्ह्यातील ६१ गावांना बसला होता फटका

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील पाच ताालुक्यातील ६१ गावे बाधित झाली होती. तर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यातील ९०,८५८ नागरिक यामुळे बाधित झाले होते. २२,९९४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.