शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीची पाहणी सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पाारशिवनी व मौदा या तालुक्यातील साोनेगाव राजा, निलज व सिंगारदीप या गावांना भेट दिली. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, वीज व अन्य नुकसानीची पाहणी केली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चाही केली. दरम्यान, ऑगस्टमध्ये आलेल्या पुराची पाहणी आता डिसेंबरमध्ये होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला.

केंद्रातून आलेल्या पथकाची दोन गटात विभागणी झाली असून यातील एका पथकाने नागपूर जिल्ह्याची गुरुवारी पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही पााहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प. चे सीईओ योगेश कुंभेजकर प्रामुख्याने उपस्थित होते. या पथकाने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरील गावांची पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झाालेली प्राथमिक मदत, सर्वेक्षण, पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती जाणून घेतली. याचवेळी पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी केली. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए.एस. महाजन यांच्यासह मंडळ अधिकारी राजेश घुडे, तलाठी विश्वजित पुरामकर पाहणी पथकात होते. २०१८ मध्ये पूर्ण झाले होते......... मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट राेजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. दुसरे एक पथक गडचिरोलीची पाहणी करीत आहे.

बॉक्स

शुक्रवारी चंद्रपूर, भंडाऱ्याची पाहणी

केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. यानंतर शनिवारी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक होईल.

बॉक्स

जिल्ह्यातील ६१ गावांना बसला होता फटका

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील पाच ताालुक्यातील ६१ गावे बाधित झाली होती. तर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यातील ९०,८५८ नागरिक यामुळे बाधित झाले होते. २२,९९४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.