शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

पाणी टाक्यांचे होणार संरचना अंकेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

कळमेश्वर : तालुक्‍यातील जीर्ण झालेल्या पाणी टाक्यांचे संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून अहवाल तयार झाल्यानंतर टाकी पाडून त्या जागी ...

कळमेश्वर : तालुक्‍यातील जीर्ण झालेल्या पाणी टाक्यांचे संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून अहवाल तयार झाल्यानंतर टाकी पाडून त्या जागी नवीन टाकीचे बांधकाम करायचे किंवा इतर उपाययोजना कराव्या लागणार याकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. तालुक्यात तीन टाक्या अती जीर्ण आहेत. त्याऐवजी नवीन टाक्या बांधकामासाठी ५१ लाख रुपयाच्या निधीची गरज भासणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील गावांतर्गत १२० च्या जवळपास पाणी टाक्या आहेत. या टाक्यांपैकी अनेक टाक्या जीर्ण झाल्या आहेत. तर काहींना गळती लागलेली आहे. तसेच काही गावातील टाक्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेता बांधण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक गावात वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नव्या टाक्या बांधणे अपेक्षित आहे. सध्या तालुक्यात कोहळी, दहेगाव व सावळी (खुर्द) या गावातील पाणी टाक्या जीर्ण झाल्या आहेत. या तीनही गावात केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी टाक्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता १५ वर्षानंतर असणाऱ्या प्रकल्पित लोकसंख्येवर तसेच अस्तित्वातील जी वापरू शकू अशा टाकीची क्षमता लक्षात घेऊन ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन नियमावलीनुसार प्रति माणसी ५५ लिटर पाणी पुरविणे अपेक्षित आहे. कोहळी येथे एक लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीसाठी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून सावळी (खुर्द) येथे २० हजार लिटर क्षमतेच्या टाकीसाठी ८ लाख तर दहेगाव येथे २० हजार लिटर क्षमतेच्या टाकीसाठी ८ लक्ष अशी एकूण ५१ लक्ष रुपये निधीची गरज भासणार आहे.

----

तालुक्यातील जीर्ण टाक्यांची संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून योग्य उपाययोजना करण्यात येईल. याकरिता ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.

रत्नदीप रामटेके

सहायक अभियंता श्रेणी २,

ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग सावनेर

----

पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तसेच पाणी टाकी व नवीन पाईपलाईन साठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

मंगेश चोरे, सरपंच, ग्रामपंचायत सावळी (खुर्द)

----

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२०० आहे. परंतु सध्या लोकसंख्या २२०० च्या जवळपास असुन प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करण्यासाठी १ लाख लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे.

विजय निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत दहेगाव.