शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

ठिकठिकाणच्या न्यायालयाच्या सुरक्षेचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी झालेल्या ‘शूटआऊट’चे सर्वत्र गंभीर पडसाद उमटले आहेत. या ...

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी झालेल्या ‘शूटआऊट’चे सर्वत्र गंभीर पडसाद उमटले आहेत. या घटनेला दिल्ली पोलिसांचे फेल्युअर मानले जात असताना सुरक्षा व्यवस्थेवरही ‘नाकामी’चा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यात मात्र या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, ठिकठिकाणच्या न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्यात आले आहे. नागपुरात सोमवारपासून सर्व न्यायालयात नवीन सुरक्षा व्यवस्था अमलात येणार आहे.

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात तेथील गँगस्टर जितेंद्र ऊर्फ गोगी याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी गोळीबार करून त्याची हत्या केली, तर गोगीची हत्या करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर करून त्यांना ठार मारले. विशेष म्हणजे, गोगीचा गेम करणारे आरोपी वकिलाच्या वेशात न्यायालयात पोहचले होते, हे एकदाचे समजण्यासारखे असले तरी त्यांच्याजवळ लोडेड पिस्तूल होत्या आणि रोहिणी कोर्टाच्या प्रवेशद्वारावर मेटल तसेच लायडिटेक्टर असताना गोगीचे मारेकरी बिनबोभाट आतमध्ये पोहचले. त्यातून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यावर चोहोबाजूने टीकेची झोडही उठली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील ठिकठिकाणच्या न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, आधीपेक्षा अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था कशी उभारण्यात येईल, यासंबंधाने पोलीस महासंचालनालयात मंथन करण्यात आले. यासंबंधाने राज्यातील सर्वोच्च न्यायालयापासून तो जिल्हा न्यायालयात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंग यांनी लोकमतला सांगितले. त्यासाठी जवळपास १५०० पोलीस (अधिकारी, कर्मचारी) नियुक्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

---

नागपुरातील न्यायालयात दोन हत्याकांड

नागपुरातील न्यायालयात १९ जून २००२ ला पिंटू शिर्के नामक गुन्हेगाराची पेशी होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. आरोपी विजय मते, राजू भद्रे आणि साथीदारांनी भर न्यायालयात पिंटू शिर्केवर ५० पेक्षा जास्त घाव घालून त्याची हत्या केली होती. तर, त्यानंतर न्यायालयातच १३ ऑगस्ट २००३ ला अक्कू हत्याकांड घडले होते.

---

नागपुरात सोमवारपासून ‘चाक चाैबंद’

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्लीच्या घटनेनंतर शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील सध्याची न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था जाणून घेतली. त्यानंतर आहे त्यापेक्षा अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले. सोमवारपासून नागपुरातील सर्व न्यायालयात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार असून, न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.

---