शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सोनिया व राहुल गांधींच्या सभेकडे विदर्भवाद्यांचे लक्ष

By admin | Updated: April 4, 2016 05:47 IST

अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर सभा होत आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या सभेत काँग्रेस पक्षश्रेष्ठी काही सूतोवाच करतात काय याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. सोनिया व राहुल गांधी यांनी विदर्भाला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्याची तयारी विदर्भवाद्यांनी चालविली आहे.विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी सातत्याने विदर्भाच्या मागणीचे समर्थन केले आहे. मात्र, अ.भा. काँग्रेस समितीकडून या मागणीला कधीच पाठबळ मिळालेले नाही. या विषयाला नेहमीच बगल दिली. आता काँग्रेस नेते विदर्भासाठी भाजपकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींची विदर्भाबाबत काय भूमिका आहे हे त्यांनी विदर्भातील या सभेत स्पष्ट करावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. तर ज्यांनी विदर्भाची स्वप्न दाखवून मते घेतली, सत्ता मिळवली. त्या भाजपा नेत्यांनी आता शब्द पाळावा. विदर्भ राज्य देण्याचा निर्णय घेणे हे केंद्रात सत्ता असलेल्यांच्या हाती आहे. भाजपने लोकसभेत वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव आणावा. काँग्रेस त्याला समर्थन देईल. त्यासाठी आम्ही पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना विनंती करू. समर्थन दिले नाही तर काँग्रेस तोंडघशी पडेल. विदर्भातील लोकांना सत्यस्थिती कळेल, अशी भूमिका घेत भाजपचे पाय भाजपच्याच गळ्यात बांधले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार लोकमतशी बोलताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भासाठी आंदोलने सुरू आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणेंचे आंदोलन हे त्याचाच एक भाग आहे. काँग्रेस श्रेष्ठींचा विदर्भाला विरोध नाही. द्विग्विजयसिंग यांनीही विरोध केला नाही. त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर हा विषय सोपविला व विदर्भातील काँग्रेस नेते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. वेगळे राज्य देण्याचा निर्णय सत्तेत असणाऱ्यांनी घ्यायचा असतो. आता काँग्रेस सत्तेत नाही. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार तेलंगना राज्य दिले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द पाळावा. केवळ आंदोलनांनेच राज्य निर्माण होते असे नाही. लोकशाहीत मागणीची दखल घेतली जावी. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणाचा विकास पाहून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपने आता निराशा न करता लेगच विदर्भ राज्याचा प्रस्ताव संसदेत मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.(प्रतिनिधी)