शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:40 AM

खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षण व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या शाळांची पटसंख्या घसरल्याने २४ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले होते. यंदाही मोठी गाज जि.प. शाळांवर पडण्याची शक्यता आहे. कारण ३४ शाळांचा पट हा ५ पेक्षाही कमी असून, भिवापूरच्या एका शाळेत तर विद्यार्थ्यांची पटसंख्या १ आहे. दिवसेंदिवस घसरत चाललेल्या पटसंख्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जि.प. च्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची रंगरंगोटीच्या माध्यमातून शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही जि.प.च्या शाळांचा पट दिवसेंदिवस घसरत आहे आणि शाळांना घरघर लागली आहे. गेल्यावर्षी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले होते. यंदा तर २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांची यादी मोठी आहे. जिल्ह्यात जि.प.च्या १५३८ वर शाळा असून येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास एक हजारावर शाळा डिजिटल आहेत. मात्र ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जि.प. शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र