शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

जनावरे चाेरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील लाेणारा परिसरात गुरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : तालुक्यातील लाेणारा परिसरात गुरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच स्थानिक तरुण व शेतकरी सतर्कही झाले आहेत. चाेरट्यांनी लाेणारा शिवारातून एक बैल व तीन गायी चाेरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांच्या सतर्कतेमुळे चाेरट्यांना यात यश आले नाही. ही घटना रविवारी (दि. १६) मध्यरात्री घडली.

प्रमोद नागपुरे व किशोर नागपुरे, दाेघेही रा. लाेणारा, ता. कळमेश्वर यांची लोणारा-उपरवाही मार्गालगत शेती असून, त्यांची सर्व जनावरे शेतातील गाेठ्यातच बांधलेली असतात. प्रमाेद नागपुरे रविवारी रात्री शेतातकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना गाेठ्यातील एक बैल गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी परिसरात शाेध घेतला. मात्र, उपयाेग झाला नाही. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास प्रमोद नागपुरे, अतुल नागपुरे, अभी नागपुरे, नीलेश नागपुरे, अमर नागपुरे, राहुल भारसाकरे, राजू घोडे, अंकित नागपुरे, निखिल नागपुरे, वृषभ नागपुरे यांनी याच शिवारात बैलाचा शाेध घ्यायला सुरुवात केली. त्यांना तीन गायी व एक बैल उपरवाहीच्या दिशेने नेले जात असल्याचे दिसले. आपल्या मागावर नागरिक असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांनी त्या जनावरांना साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्या तीन गायी किशाेर नागपुरे यांच्या असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

...

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

महिनाभरापूर्वी प्रमोद नागपुरे यांच्या दोन गायी, तसेच २१ सप्टेंबर २०२० च्या मध्यरात्री सेलू, ता. कळमेश्वर येथील सुधाकर कुबडे यांचे दाेन बैल व पाच गायी, तसेच विजय गजभिये यांची बैलजाेडी चाेरट्यांनी चाेरून नेली. गुरांची संख्या कमी हाेत असून, किमती वाढल्या आहेत. जनावरे चाेरीला जात असल्याने शेतीची कामे प्रभावित हाेत असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पाेलीस गुरांच्या चाेरीच्या घटनांचा तपास फारसा गांभीर्याने करीत नाहीत. चाेरून नेलेली जनावरे थेट कत्तलखान्यात नेली जात असल्याने ती सापडण्याची शक्यताही नसते. त्यामुळे पाेलिसांनी गुरे चाेरट्यांचा कायमचा बंदाेबस्त करण्याची मागणीही केली जात आहे.